दुसऱया टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. राज्यातील पंचवीस लोकसभा मतदारसंघात तेवीस तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळं या पंचवीस मतदारसंघातील
जाहीर प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानात राज्यातील जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, दिंडोरी, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बारामती, पुणे, मावळ, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे.
निवडणूकीच्या या टप्प्यात शरद पवार, ए आर अंतुले, सुप्रिया सुळे, सुरेश कलमाडी. समीर भुजबळ, गोपीनाथ मुंडे, सुरेश प्रभु रामदास आठवले या दिग्गजांच भवितव्य ठरणार आहे.
त्यामुळं या मतदारसंघातील प्रचाराची राळ आज थांबणार आहे. राज्य आणि केंद्रातील अनेक दिग्गज नेते या मतदारसंघातून निवडणूक लढवताहेत.