गुरुवार, १४ मे, २००९

वरुण गांधींवरचा रासुका हटवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश


वरूण गांधींवर उत्तर प्रदेश सरकारने लावलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा हटविण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. पिलीभीतमध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषण प्रकरणी मायावती सरकारने वरूण गांधीं यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई केली होती. त्याविरोधात वरूण गांधी यांनी सु्प्रीम कोर्टात धाव घेतली होती त्यावर निर्णय़ देताना आज सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला आहे. या निर्णयानंतर उत्तर प्रदेश सरकारने या आधी काढलेला वरूण गांधींविरूद्ध स्थानबद्ध करण्याचा आदेश मागे त्यांना घ्यावा लागणार आहे. वरूण गांधी हे उत्तर प्रदेशातल्या पिलीभीत मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.