रविवार, २४ मे, २००९
बुधवार, २० मे, २००९
रविवार, १७ मे, २००९
अपडेट 17 मे
- काँग्रेस कार्यसमितीची बैठक
- बैठकीला पंतप्रधान मनमोहन सिंग,सोनिया गांधी उपस्थित
- काँग्रेसला लालूप्रसाद यादवांची गरज नाही- बिहार काँग्रेस प्रभारी इकबाल सिंह यांचं वक्तव्य
- लालकृष्ण अडवाणींना भेटले संघाचे नेते
- उमा भारती अडवाणींना भेटल्या
- समाजवादी पार्टी काँग्रेसला पाठिंबा देणार - अमरसिंग
शनिवार, १६ मे, २००९
मनेका,चिदंबरम फेरमतमोजणीत विजयी
महाराष्ट्रात अनेक दिग्गजांना जनतेनं आसमान दाखवलं. यात केद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता पाटील, भाजपचे दिग्गज नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, सलग पाच वेळेस निवडून आलेले मोहन रावले, शिवसेनेचे चार वेळा आमदार राहिलेले आणि पहिल्यांदाच लोकसभा लढविणारे गजानन किर्तीकर, सलग तीन वेळा लोकसभेवर जाणारे रामदास आठवले, किरीट सोमय्या, प्रकाश आंबेडकर यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. भाजपच्या मनेका गांधी, केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम हे मात्र फेरमतमोजणीत विजयी ठरले.
महाराष्ट्राचे 48 विजयी उमेदवार
महाराष्ट्राचे 48 विजयी उमेदवार1.नंदूरबार(एसटी)-उ.महाराष्ट्र-माणिकराव गावित (CONG)
2.धुळे-उ.महाराष्ट्र-प्रतापराव सोनावणे (BJP)
3.जळगाव-उ.महाराष्ट्र-ए. टी पाटील (BJP)
4.रावेर-उ.महाराष्ट्र-हरिभाऊ जावळे (BJP)
5.बुलडाणा-विदर्भ-प्रतापराव जाधव (SHS)
6.अकोला-विदर्भ-संजय धोत्रे (BJP)
7.अमरावती(एससी)-विदर्भ-आनंदराव आडसूळ (SHS)
8.वर्धा-विदर्भ-दत्ता मेघे (CONG)
9.रामटेक(एससी)-विदर्भ-मुकूल वासनिक (CONG)
10.नागपूर-विदर्भ-विलास मुत्तेमवार (CONG)
11.भंडारा-गोंदिया-विदर्भ-प्रफुल्ल पटेल (NCP)
12.गडचिरोली-चिमूर-विदर्भ-मारोतराव कोवासे (CONG)
13.चंद्रपूर-विदर्भ-हंसराज अहिर (BJP)
14.यवतमाळ-वाशिम-विदर्भ-भावना गवळी (SHS)
15.हिंगोली-मराठवाडा-सुभाष वानखेडे (SHS)
16.नांदेड-मराठवाडा-भास्करराव पाटील-खतगावकर(CONG)
17.परभणी-मराठवाडा-गणेश दूधगावकर (SHS)
18.जालना-मराठवाडा-रावसाहेब दानवे (BJP)
19.औरंगाबाद-मराठवाडा-चंद्रकांत खैरे (SHS)
20.दिंडोरी(एसटी)-उ.महाराष्ट्र-हरिश्चंद्र चव्हाण (BJP)
21.नाशिक-उ.महाराष्ट्र-समीर भुजबळ (NCP)
22.पालघर(एसटी)-कोकण-उ.महाराष्ट्र-बळीराम जाधव(बहुजन विकास)
23.भिवंडी-कोकण-सुरेश तावरे (CONG)
24.कल्याण-कोकण-आनंद परांजपे (SHS)
25.ठाणे-कोकण-संजीव नाईक (NCP)
26.मुंबई उत्तर-मुंबई-संजय निरूपम (CONG)
27.मुंबई वायव्य-मुंबई-गुरूदास कामत (CONG)
28.मुंबई ईशान्य-मुंबई-संजय दिना पाटील (NCP)
29.मुंबई-उत्तर-मध्य-मुंबई-प्रिया दत्त (CONG)
30.मुंबई-दक्षिण-मध्य-मुंबई-एकनाथ गायकवाड (CONG)
31.मुंबई दक्षिण-मुंबई-मिलिंद देवरा (CONG)
32.रायगड-कोकण-अनंत गिते (SHS)
33.मावळ-प.महाराष्ट्र-गजानन बाबर (SHS)
34.पुणे-प.महाराष्ट्र-सुरेश कलमाडी (CONG)
35.बारामती-प.महाराष्ट्र-सुप्रिया सुळे (NCP)
36.शिरूर-प.महाराष्ट्र-शिवाजीराव आढळराव (SHS)
37.अहमदनगर-प.महाराष्ट्र-दिलीप गांधी (BJP)
38.शिर्डी(एससी)-प.महाराष्ट्र-भाऊसाहेब वाकचौरे (SHS)
39.बीड-मराठवाडा-गोपीनाथ मुंडे (BJP)
40.उस्मानाबाद-प.महाराष्ट्र-मराठवाडा-पद्मसिंह पाटील (NCP)
41.लातूर(एससी)-मराठवाडा-जयवंतराव आवळे (CONG)
42.सोलापूर(एससी)-प.महाराष्ट्र-सुशीलकुमार शिंदे (CONG)
43.माढा-प.महाराष्ट्र-शरद पवार (NCP)
44.सांगली-प.महाराष्ट्र-प्रतिक पाटील (CONG)
45.सातारा-प.महाराष्ट्र-छ.उदयन राजे भोसले (NCP)
46.रत्नागिरी-सिंधुदुर्ग-कोकण-निलेश राणे (CONG)
47.कोल्हापूर-प.महाराष्ट्र-सदाशिवराव मंडलिक-स्वा.शे.सं
48.हातकणंगले-प.महाराष्ट्र-राजू शेट्टी - स्वा.शे.सं
केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील पराभूत

हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सुभाष वानखेडे विजयी झाले आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा धक्कादायक पराभव केला आहे.
राष्ट्रवादीच्या तीन विद्यमान खासदारांना पराभव पत्कारावा लागला आहे. सूर्यकांता पाटील 1991 साली नांदेडमधून आणि 1998 साली हिंगोलीतून निवडून आल्या होत्या. एका निवडणुकीत विजय आणि त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव ही परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे हे विशेष.
राष्ट्रवादीच्या तीन विद्यमान खासदारांना पराभव पत्कारावा लागला आहे. सूर्यकांता पाटील 1991 साली नांदेडमधून आणि 1998 साली हिंगोलीतून निवडून आल्या होत्या. एका निवडणुकीत विजय आणि त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव ही परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे हे विशेष.
भाजपाच्या किरीट सोमैय्यांचा धक्कादायक पराभव
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल लागला आहे. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातुन भाजपाच्या किरीट सोमैय्यांना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दीना पाटील यांनी त्यांचा पाच हजार मतांनी पराभव केला आहे. मुंबई उत्तर पूर्व मध्ये तिरंगी लढतीत संजय पाटील यांना 2,15,000, किरीट सौमैय्यांना 2,10,000 तर मनसेचे शिशिर शिंदे यांना 1,94,000 मतं मिळाली आहेत. शिंदे यांनी सौमैय्यांच्या पराभवाला हातभार लावल्याचं दिसून येतयं.
लेबल:
किरीट सोमैय्या,
भाजपा,
bjp,
kirit somaiyya
राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात हादरा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडलं आहे. कोल्हापूरमध्ये अपक्ष बंडखोर सदाशिवराव मंडलिक यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा धक्कादायक पराभव केला आहे. आजवर लोकसभेच्या निवडणुकीत कधीही पराभूत न होण्याची परंपरा मंडलिक यांनी राखली आहे.
राजकीय कारकिर्दीत कधीही मागे हटायचं नाही हे मंडलीकांचे स्वभाव वैशिष्ठ्ये त्याला अनुसरून मंडलीकांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं. मंडलिकांच्या झंझावाता समोर एक प्रकारे पवारांचाच पराभव झाला आहे.
हातकणंगलेतही निवेदिता माने पराभूत झाल्या आहेत. स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे हे निश्चित.
राजकीय कारकिर्दीत कधीही मागे हटायचं नाही हे मंडलीकांचे स्वभाव वैशिष्ठ्ये त्याला अनुसरून मंडलीकांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं. मंडलिकांच्या झंझावाता समोर एक प्रकारे पवारांचाच पराभव झाला आहे.
हातकणंगलेतही निवेदिता माने पराभूत झाल्या आहेत. स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे हे निश्चित.
सुशीलकुमार शिंदे, प्रिया दत्त विजयी, राम नाईक पराभूत

सोलापूर राखीव मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे शरद बनसोडे यांचा पराभव केला आहे. माकपचे आमदार नरसय्या आडम यांनी बसपाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने शिंदे अ़डचणीत आले होते.
पण शिंदे यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली आहे.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात प्रिया दत्त सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाचे महेश जेठमलानी यांचा पराभव केला आहे. बसपाच्या तिकिटावर लढतीत असलेले इब्राहीम भाईजान यांच्या झंझावती प्रचाराने मतविभागणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्याचा फटका प्रिया दत्त यांना बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण अखेरीस प्रिया दत्त विजयी झाल्या.

मुंबईतील दुसऱ्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. भाजपाचे दिग्गज उमेदवार राम नाईक यांना मुंबई उत्तर मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसचे संजय निरुपम यांनी नाईकांचा पराभव केला आहे. मनसेच्या शिरीष पारकर यांनी नाईकांच्या पराभवाला हातभार लावला.
पण शिंदे यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली आहे.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात प्रिया दत्त सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाचे महेश जेठमलानी यांचा पराभव केला आहे. बसपाच्या तिकिटावर लढतीत असलेले इब्राहीम भाईजान यांच्या झंझावती प्रचाराने मतविभागणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्याचा फटका प्रिया दत्त यांना बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण अखेरीस प्रिया दत्त विजयी झाल्या.

मुंबईतील दुसऱ्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. भाजपाचे दिग्गज उमेदवार राम नाईक यांना मुंबई उत्तर मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसचे संजय निरुपम यांनी नाईकांचा पराभव केला आहे. मनसेच्या शिरीष पारकर यांनी नाईकांच्या पराभवाला हातभार लावला.
दत्ता मेघे, प्रफुल पटेल विजयी तर अंतुले पराभूत

वर्ध्यातून काँग्रेसचे दत्ता मेघे विजयी झाले आहेत त्यांनी भाजपाच्या सुरेश वाघमारे यांचा पराभव केला आहे. या आधी मेघे 1991 साली नागपूर, 1996 साली रामटेक आणि 1998 साली वर्ध्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. सलग तीन लोकसभा निवडणुका तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल विजयी झाले आहेत. पटेल यांना २००४ साली निसटत्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. भंडार-गोंदियात काँग्रेसचे आमदार नानाभाऊ पटोल यांनी बंडखोरी केल्याने प्रफुल पटेल यांना मतविभागणीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण पटेल यांनी तिरंगी लढतीत अखेर बाजी मारली. भाजपाचे विद्यमान खासदार शिशूपाल पटले यांना पराभव पत्करावा लागला आहे.रायगडमध्ये काँग्रेसचे विद्यमान खासदार ए.आर.अंतुले यांना शिवसेनेचे अनंत गीते यांच्या कडून पराभव पत्करावा लागला आहे. रायगडमध्ये अलिबागचे काँग्रेस आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव प्रवीण ठाकूर यांनी बंडखोरी केली होती. त्याचप्रमाणे अंतुलेंच्या कार्यपध्दतीबद्दल मतदारसंघात तीव्र नाराजीही होती.
लेबल:
अंतुले,
दत्ता मेघे,
प्रफुल्ल पटेल,
antule,
congress,
datta meghe,
praful patel
काँग्रेसने मानले आभार, भाजपला कौल मान्य
निलेश राणे विजयी

रत्नागिरी-सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघातून डॉ.निलेश राणे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघातुन सुरेश प्रभू सलग चार वेळा निवडून आले होते. या मतदारसंघात बसपाचे जयेंद्र परुळेकर आणि काँग्रेस बंडखोर अकबर खलिफे हेही रिंगणात होते.
नारायण राणे यांच्या नात्यातील अंकुश राणे यांचे अपहरण आणि खुनामुळे या मतदारसंघातील वातावरण तणावपूर्ण झालं होत. नारायण राणे यांनी या संदर्भात सेनेच्या संजय राऊत आणि वैभव नाईक यांच्यावर आरोप केले होते.
राष्ट्रवादीचा निलेश राणे यांना विरोध होता पण नारायण राणेंनी यांनी आपलं सर्वस्व पणाला लावत आपले चिरंजीव निलेश राणे यांना निवडून आणलं आहे.
नारायण राणे यांच्या नात्यातील अंकुश राणे यांचे अपहरण आणि खुनामुळे या मतदारसंघातील वातावरण तणावपूर्ण झालं होत. नारायण राणे यांनी या संदर्भात सेनेच्या संजय राऊत आणि वैभव नाईक यांच्यावर आरोप केले होते.
राष्ट्रवादीचा निलेश राणे यांना विरोध होता पण नारायण राणेंनी यांनी आपलं सर्वस्व पणाला लावत आपले चिरंजीव निलेश राणे यांना निवडून आणलं आहे.
समीर भुजबळ अटीतटीच्या लढतीत विजयी
नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी अटीतटीच्या लढतीत विजयश्री खेचून आणली आहे. मनसेचे हेमंत गोडसे यांनी त्यांच्या समोर मोठं आव्हान उभं केलं होतं. जातीयवादी प्रचाराने नाशिक ढवळून निघालं होतं. मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करा असा उघड प्रचार झाल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जातीने लक्ष घातलं होतं.
प्रचारादरम्यान छगन भुजबळ हळवे झाले होते त्यांनी मतदारांना समीर भुजबळ यांना निवडून देण्याकरता भावनिक आव्हान केलं होते.
शिवसेनेचे दत्ता गायकवाड, मनसेचे हेमंत गोडसे हे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे तर बसपाचे उमेदवार सुधारदास महंत हे ब्राह्मण समाजाचे उमेदवार रिंगणात असल्याने सर्वांचेच लक्ष नाशिकने वेधून घेतलं होतं.
मनसेच्या आंदोलनाला नाशिकमध्ये चांगला प्रतीसाद लाभला होता त्यामुळे या मतदारसंघात मनसेला विजयाच्या आशा होत्या. पण समीर भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या पदापर्णाच्या लढतीत विजय प्राप्त केला आहे.
प्रचारादरम्यान छगन भुजबळ हळवे झाले होते त्यांनी मतदारांना समीर भुजबळ यांना निवडून देण्याकरता भावनिक आव्हान केलं होते.
शिवसेनेचे दत्ता गायकवाड, मनसेचे हेमंत गोडसे हे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे तर बसपाचे उमेदवार सुधारदास महंत हे ब्राह्मण समाजाचे उमेदवार रिंगणात असल्याने सर्वांचेच लक्ष नाशिकने वेधून घेतलं होतं.
मनसेच्या आंदोलनाला नाशिकमध्ये चांगला प्रतीसाद लाभला होता त्यामुळे या मतदारसंघात मनसेला विजयाच्या आशा होत्या. पण समीर भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या पदापर्णाच्या लढतीत विजय प्राप्त केला आहे.
लेबल:
राष्ट्रवादी,
समीर भुजबळ,
NCP,
samir bhujbal
महाराष्ट्रात भाजपाकडे दोन जागा

जळगाव मधून भाजपाचे ए.टी.पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे वसंतराव मोरे यांचा पराभव केला आहे. जळगावातून राष्ट्रवादी संपवण्याची भाषा करणाऱ्या सुरेशदादा जैन यांनी मोरे यांच्या पराभवाला हातभार लावला आहे. राष्ट्रवादीचे मोरे लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाले होते.
जालना लोकसभा मतदारसंघातुन रावसाहेब दानवे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे डॉ.कल्याण काळे यांचा पराभव केला आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातुन रावसाहेब दानवे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे डॉ.कल्याण काळे यांचा पराभव केला आहे.
शिवसेनेने तीन जागा जिंकल्या

महाराष्ट्रातील बहुतेक जागांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. त्यापैकी शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून आनंद परांजपे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे यांचा पराभव केला आहे. परांजपे यांचा सलग दुसरा विजय तर डावखरे यांचा सलग तिसरा पराभव.
शिरुरमध्येही शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे यांचा पराभव केला आहे.
शिर्डीतही भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा पराभव केला आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातुन काँग्रेसचे सुरेश टावरे विजयी झाले आहेत. भिवंडीत पंचरंगी लढतीत भाजपाचे जगन्नाथ पाटील, मनसेचे डी.के.म्हात्रे, सपाचे आर.आर.पाटील, अपक्ष विश्वनाथ पाटील यांचा पराभव केला.
शिरुरमध्येही शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे यांचा पराभव केला आहे.
शिर्डीतही भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा पराभव केला आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातुन काँग्रेसचे सुरेश टावरे विजयी झाले आहेत. भिवंडीत पंचरंगी लढतीत भाजपाचे जगन्नाथ पाटील, मनसेचे डी.के.म्हात्रे, सपाचे आर.आर.पाटील, अपक्ष विश्वनाथ पाटील यांचा पराभव केला.
काँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा
काँग्रसने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा असं राष्ट्रवादी काँग्रेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. यूपीए 252 जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीए 158 जागांवर तसेच तिसऱी आघाडी 88 , चौथी 28 जागांवर आघाडीवर आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर छत्रपती उदयनराजे भोसले हे विजयी झाले आहेत. काँग्रेसची 14 जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेसचे माणिकराव गावित नंदूरबार मधून नवव्या वेळेस विजयी झाले आहेत.
लेबल:
काँग्रेस,
पवार,
राष्ट्रवादी काँग्रेस,
congress,
NCP,
sharad pawar
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
