गुरुवार, ३० एप्रिल, २००९

सोमवार, २७ एप्रिल, २००९

पाहा शरद पवार यांची दणदणीत मुलाखत

विजय चौगुलेंचं राज ठाकरे यांना खुलं आव्हान

मनसेचा महेश जेठमलानींवर आरोप


ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी काल राज ठाकरेंवर भडकले. जेठमलानी हे अफजल गुरूची वकिली करत असल्याचा आरोप राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून करत असल्यानं जेठमलानींनी राज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा केली. जेठमलानी यांनी यासंदर्भात राज ठाकरेंना नोटीस पाठवून राज ठाकरे यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. राज ठाकरे हे एक बेजबाबदार नेते आहेत, असे वक्तव्य त्यांनी स्टार माझाशी बोलताना केलेच. पण त्याचबरोबर, माझ्यावर खोटेनाटे आरोप करणं राज ठाकरे यांना महागात पडेल, असा इशारा द्यायलाही ते विसरले नाहीत.
भाजप शिवसेनेचे राज्यसभेतले माजी खासदार राम जेठमलानी यांनी राज ठाकरेंवर खोटा प्रचार केल्याचा आरोप केल्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. उत्तर मध्य मुंबईतले भाजपचे उमेदवार महेश जेठमलानी यांच्या विरूद्ध,
मुंबई उपनगराचे निवडणूक अधिकारी विश्वास पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे., धर्माचा आधार घेऊन प्रचार केल्याचा आरोप महेश जेठमलानी यांच्यावर करण्यात आला आहे. त्यासाठी पुरावा म्हणून महेश जेठमलानींचे वडिल राम जेठमलानी यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या ख्रिश्चन मतदारांना उद्देशून लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करण्यात आला आहे

प.बंगालमध्ये डावे हुकूमशाही राबवत असल्याचा सोनियांचा आरोप



काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी आज पश्चिम बंगालमधल्या प्रचार सभेत डाव्या आघाडीवर हल्लाबो केला. डावी आघाडी पश्चिम बंगालमध्ये हुकूमशाही राबवत आहे, आणि त्यामुळे तिथे गरीब आणि अल्पसंख्याकांचा विकास होऊ शकलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला.मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या एका दुर्गम खेड्यातल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. डाव्या आघाडीच्या अनास्थेमुळेच पश्चिम बंगालमधल्या लाखो गरीबांना राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड मिळू शकली नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. मुर्शिदाबाद हा पश्चिम बंगालमधला एकमेव मुस्लीम बहुल जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातल्या प्रचारसभेत सोनिया गांधींनी यूपीए सरकारने अल्पसंख्याकांसाठी केलेल्या प्रचारसभेचा पाढा वाचला. सिंगूर आणि नंदिग्राम मधल्या हिंसाचाराचा उल्लेख करत त्यांनी डाव्या आघाडीच्या नेत्यांवर तोफ डागली. डाव्या आघाडीचे नेते स्वतःला गरीब, शेतकरी आणि कामगार वर्गाचे वाली म्हणवून घेतात, मात्र स्वतःच्याच जमीनीचं रक्षण करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करतात, या लाखो शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन जमिनीवर उतरणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना लाठीचा मार खावा लागला असल्याचं त्यांनी सांगितलं. मुर्शिदाबादच्याच जांगीपूर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी निवडणूक लढवत आहेत. त्यांनीही आपल्या भाषणात डाव्या आघाडीवर लोकशाहीच्या नावावर हुकूमशाही राबवत असल्याचा आरोप केला. या जाहीर सभेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचंही भाषण झालं. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांची पश्चिम बंगालमध्ये युती आहे. गेल्या 30 पेक्षा जास्त वर्षाहून राज्यात डावी आघाडी सत्तेत आहे, या 30 वर्षांच्या काळातही डाव्या आघाडीला राज्यातल्या गरीब आणि अल्पसंख्यांकाचे प्रश्न सोडवता आले नाहीत. आपल्या 12 मिनिटांच्या हिंदी भाषणातून सोनिया गांधींनी राज्यातल्या डाव्या आघाडीवर कडाडून टीका करतानाच केंद्र सरकारने पश्चिम बंगालसाठी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. डाव्या आघाडीने केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजनांची राज्यात अंमलबजावणी करताना फक्त नेत्यांचाच विचार केला, सामान्य लोकांचा नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

गुरुवार, २३ एप्रिल, २००९

लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज देशभरात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु झालं आहे. देशभरातील एकशे एक्केचाळीस मतदारसंघात आज मतदान होत आहे. तर राज्यातील पंचवीस मतदारसंघातही आज मतदान होत आहे. या पंचवीस मतदारसंघामधून राज्यातील तसचं केंद्रातील दिग्गज नेतेही निवडणूक लढवताहेत. त्यामुळे आज या दिग्गज नेत्यांचही भवितव्य इलेक्ट्रॉनिक मशीन्समध्ये बंद होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बुधवार, २२ एप्रिल, २००९

देशभरातल्या प्रमुख लढती

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या होत आहे. राजकारणातील अनेक रथीमहारथींचे भवितव्य पणाला लागलेलं आहे. उद्या मतदारराजा आपला कौल देईल. देशभरातल्या प्रमुख लढतींमध्ये आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे भाऊ वाय.एस.जगमोहन रेड्डी हे कडापामधून रिंगणात आहे. कर्नाटकात दक्षिण बंगलोरमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार लढतीत आहेत तर बंगलोर ग्रामीण मध्ये भूतपूर्व पंतप्रधान देवेगौडा यांचे चिंरजीव एच.डी.कुमारस्वामी आपलं नशीब आजमावत आहेत त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसच्या तेजस्वीनी गौडा. गुलबर्गात काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जून खर्गे निवडणूक लढवत आहेत. तर बंगलोर उत्तर मध्ये काँग्रेसचे वयोवृध्द नेते माजी रेल्वे मंत्री सी.के.जाफर शरीफ, उत्तर कन्नाडात काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा आणि भाजपाचे अनंतकुमार हेगडे यांच्यात लढत आहे. अल्वांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलांना तिकिट न दिल्याने हायकमांडवर टीका केली होती.
उत्तर प्रदेशात अमेठीत राहुल गांधी आणि भाजपाचे आर.बी.सिंग यांच्यात सामना आहे. तर आंबेडकर नगरमध्ये भाजपाचे विनय कटियार मतदारांना सामोरं जात आहेत. प्रतापगड मध्ये तिरंगी लढतीत अपना दलाचे आतिक अहमद, काँग्रेसच्या राणी रत्ना सिंग आणि सपाचे अक्षय प्रताप सिंग आपलं नशीब आजमावत आहेत.
बिहारमध्ये हाजीपूर मध्ये रामविलास पासवान, मुझफ्फरपूर मध्ये साथी जॉर्ज फर्नांडीस आपल्या आयुष्यातली अखेरची निवडणूक लढवत आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी फर्नांडीसांचे शिष्य त्यांना सोडून गेल्याने एकाकी लढत देण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपलीय. वैशालीत केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंग, मधूबनीत केंद्रीय गृह राज्य मंत्री शकील अहमद आणि भाजपाच्या हुकुमदेव नारायण यादव यांच्यात लढत आहे. पश्चिम चंपारणमध्ये लोक जनशक्तीच्या तिकिटावर सिने दिग्दर्शक प्रकाश झा आणि राजदचे साधु यादव यांच्यात प्रेक्षणीय लढत आहे.
मध्यप्रदेशातही अनेक दिग्गज उद्या मतदारांना सामोरे जातील त्यात छिंदवाड्यात कमलनाथ, रिवात भाजपाचे चंद्रमणी त्रिपाठी आणि सिधीत अर्जून सिंग यांच्या कन्या बंडखोर उमेदवार वीणा सिंग लढतीत आहेत.
झारखंडमध्ये जमशेदपूरमध्ये अर्जून मूंडा आणि शैलेंद्र माहतो यांच्यात सामना आहे. दुमरात शिबू सोरेन आपलं नशीब आहेत. सोरेन विधानसभेच्या पोटनिवडणूकीत पराभूत झाल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं होत. सिंगभूममधून माजी मुख्यमंत्री मधू कोडा निवडणूक लढवत आहेत.

सोमवार, २० एप्रिल, २००९

आजची फेकाफेकी

प्रचाराच्या तोफा..

दुसऱया टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. राज्यातील पंचवीस लोकसभा मतदारसंघात तेवीस तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळं या पंचवीस मतदारसंघातील
जाहीर प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानात राज्यातील जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, दिंडोरी, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बारामती, पुणे, मावळ, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे.
निवडणूकीच्या या टप्प्यात शरद पवार, ए आर अंतुले, सुप्रिया सुळे, सुरेश कलमाडी. समीर भुजबळ, गोपीनाथ मुंडे, सुरेश प्रभु रामदास आठवले या दिग्गजांच भवितव्य ठरणार आहे.
त्यामुळं या मतदारसंघातील प्रचाराची राळ आज थांबणार आहे. राज्य आणि केंद्रातील अनेक दिग्गज नेते या मतदारसंघातून निवडणूक लढवताहेत.

रविवार, १९ एप्रिल, २००९

कसाबचं रेशनकार्ड राज ठाकरेंच्या सभेत

राहुल पंढरपुरात तर पवार सांगोल्यात


राजकारणातलं वजन सभेत गर्दी खेचण्यासाठी किती उपयोगाचं पडतं हे आज सोलापुरात पहायला मिळालं. सोलापूर जिल्हयात आज दोन दिग्गजांच्या सभा आहेत. काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांची आज पंढरपुरात तर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची सभा सांगोल्यात आहे. पण पवारांच्या सभेत जनसागर लोटल्याचं दिसतंय. पण पंढरपुरात मात्र चित्र वेगळंच आहे. राहुल गांधी यांच्या सभेला मात्र हजारभरही लोक नाहीत. एक तर टळटळीत दुपारची वेळ आणि राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी घेतलेली खबरदारी. पंढरपुरातल्या सभेतल्या लोकांकडून पोलिसांनी ओळखपत्र मागितली. त्यामुळे झालं असं की लोक या सभेला थांबलेच नाहीत. त्या उलट पवारांच्या सभेला मात्र तुफान गर्दी झालीये.

मंगळवार, १४ एप्रिल, २००९

आजची 'फेकाफेकी'

एका मताचं मोल

भारतातल्या कोट्यावधी मतदारांपैकी सर्वात भाग्यवान मतदार जर कोण असेल तर ते आहेत भारतदास दर्शनदास त्याला कारणही तसचं आहे कारण त्यांना मतदानासाठी रांगेत उभं राहावं लागणार नाहीये. त्यांच्या एकट्यासाठी स्वतंत्र मतदानाची सोय करण्यात आलीयं. पुजारी असलेले भारतदास दर्शनदास हे गुजरातच्या अतीदुर्गम भागातील गीरच्या वाघांच्या अभयअरण्यात वास्तव्य करतात. त्यांना मतदान करता यावं याकरता तब्बल तीन निवडणूक अधिकारी आणि दोन पोलीस इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनसह रवाना होणार आहेत. त्याकरता त्यांना नदी आणि वाळवंट पार करण्याचं दिव्य करावं लागणार आहे. गेली एक दशक ते जंगलातल्या एका छोट्या मंदिरात वास्तव्य करत आहेत. तिथे विजेची तसचं पाण्याची आणि आरोग्य सूविधा नसल्याबाबत त्यांची तक्रार आहे. ते म्हणतात जवळच्या गावात पोहचायला त्यांना तब्बल दोन तास पायपीट करावी लागते. काही वेळा त्यांच्या घराबाहेर वाघ येऊन मुक्काम ठोकतात अशावेळेस ते जाईपर्यंत प्रतिक्षा करावी लागते असंही त्यांनी सांगितलं. गिर अभयाअरण्यातील मंदिराला भेट देणाऱ्या भक्तांच्या दानावर ते आपला उदरनिर्वाह करतात. गिरचं अभयअरण्य १४०० स्केवअर मीटर प्रदेशावर पसरलेलं आहे. या संरक्षित जंगलात वास्तव्य करणारे मालधारी आदिवासी त्यांना खायला देतात. पण त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत वाद असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नाहीये. मालधारी आदिवासींच्या मुलांना धार्मिक ग्रंथांतील शिकवण देतात. रेडिओवरील बातम्या ऐकून ते देशातील घडामोडींची माहिती ठेवतात. माझ्या एका मताला फारशी किंमत नसल्यानेच आजवर कुणीही राजकारणी आपल्या भेटीस आलं नसल्याचं सांगताना देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्या विषयीचा निर्धारही ते व्यक्त करतात.

अपडेट14 एप्रिल

* पहि्ल्या टप्प्यातल्या मतदानाचा प्रचार संपला, 5 वाजेपासून प्रचार बंद

* लालकृष्ण अडवाणी यांच्या हेलिकॉप्टरच्या पायलटवर पंढरपुरात गुन्हा दाखल
* ४ एप्रिलला झालेल्या सभेसाठी पोलिसांच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे गुन्हा दाखल

* मला बंदीवासात टाकण्यासाठी जेल अजून तरी अस्तित्वात नाही- नरेंद्र मोदींची कपिल सिब्बल यांच्या टीकेला उत्तर
* मोंदींनी काँग्रेसवर टीका करताना जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी – कपिल सिब्बल

मनमोहन-अडवाणी आमनेसामने


देशाचा कारभार आतापर्यंतच्या सर्वात कमकुवत पंतप्रधानांच्या हाती असल्याचं अडवाणींचं वक्तव्य पंतप्रधान मनमोहन सिंहांनीं चांगलचं मनाला लावून घेतलेलं दिसतंय.दिल्लीत डॉ बाबासाहेब आंबेकडरांच्या जयंती निमित्ताने आयोजित कारण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी भाजप आणि काँग्रेस दोघांचेही पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले अडवाणी आणि मनमोहन सिंह एकाच मंचावर आले. पण सध्या त्या दोघांच्यात सुरू असेलल्या वाकयुद्धाचा परिणाम इतका गंभीर झालाय की अडवाणी आणि पंतप्रधान एकमेककडे बघणंही टाळलं. त्यानंतर अडवाणींनी केलेल्या अभिवादनानंतर पंतप्रधानानी तेही स्वीकारलं नाही. आता राजकारणात विशेषतः निवडणूकांच्या प्रचारात एकामेकांवर आरोप प्रत्यारोप होतच असतात. पण सध्या दोन्ही प्रमुख पक्षांच्या या नेत्यांमध्ये वैयक्तिक स्तरावर जाऊन होत असलेल्या प्रचारामुळे राजकारण खरोखरोच दुषित झालं हेच या प्रसंगावरून पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

सोमवार, १३ एप्रिल, २००९

अपडेट 13 एप्रिल

*राज ठाकरे यांची अहमदनगरमधील सिन्नरला जाहीर सभा
दहशतवादी संसदेच्या थोड्या आत घुसले असते तर देशाचे अनेक प्रश्न सुटले असते -राज ठाकरे

* घर के आखाडे मे हर कोई पहैलवान होता है, राज ठाकरे साहब पटना आकर बोलके दिखाये- शेखर सुमन यांची पटना साहिब येथे राज ठाकरे यांच्यावर टीका
* शेखर सुमन कोन आहे मी ओळखत नाही - शर्मिला ठाकरेंचे शेखर सुमन यांच्या टीकेला मुंबईत उत्तर

*हे काही पक्ष मराठी-मराठी करणारे आपल्या मुलांना शिकायला कॉन्व्हेंटमध्ये पाठवतात- शरद पवारांची टीका.

दादा मला एक वहिनी आण...

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी त्यांची बहिण प्रियांका गांधीही सरसावल्या आहेत. अमेठी मतदारसंघातल्या खेड्यापाड्यात जाऊन त्या लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. नागरिकांची आपुलकीनं विचारपूस करुन त्यांचे प्रश्न जाणून घेत, त्यांना राहुलभैय्याला मत देण्याचं आवाहन करतायत. नरेंद्र मोदींनी काँग्रेसला बुढिया असं हिणवल्यानंतर प्रियांकांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. नरेंद्र मोदी, अडवाणी हे स्वतला तरुण समजतात की काय..अशी खोचक टीकाही त्यांनी केली होती.
प्रचारासाठी आलेल्या प्रियंका गांधींनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही दिलखुलास उत्तरं दिली.पत्रकारांच्या एका प्रश्नावर राहुल गांधी हे एकदिवस देशाचे पंतप्रधान नक्की होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण त्याआधी तो नवरदेव झालेला पाहायला आवडेल असंही म्हटलं..

आजची 'फेकाफेकी'

बदलले प्रचाराचे फंडे

पंतप्रधानांचा भाजपावर घणाघाती हल्ला


पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे दुबळे पंतप्रधान आहेत, अशी टीका करणा-या भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज पंतप्रधानांनी शालजोडीतले टोले लगावले. भारताचा विकास करणा-या आणि भारतीयांना एकत्र ठेवू शकेल, अशा नेतृत्वाची देशाला गरज आहे. जाती, धर्म आणि प्रांताच्या नावावर भारतीयांना भारतीयांविरुद्ध लढवणा-या आणि बुरसटलेली, जुनीपुरानी विचारधारा बाळगणा-या नेतृत्वाची गरज नाही, असा टोला डॉ. मनमोहन सिंग यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारासाठी पंतप्रधान डॉ. सिंग यांनी आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये उद्योगपती, बॉलिवूडशी संबंधित व्यक्ती तसेच विविध वर्गांच्या प्रतिनिधींची खास बैठक घेतली. त्यावेळी देशाचे नेतृत्व कसे असावे, याचा ताळेबंद पंतप्रधानांनी उलगडून दाखवला. भारताला प्रगतीपथावर नेणारे नेतृत्व देण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे, असे सांगताना देशाच्या, मुलाबाळांच्या आणि नातवंडाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काँग्रेसला मत द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जगामध्ये सध्या नेमक्या काय घडामोडी चालू आहेत, याचा अंदाज घेऊन निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाची देशाला गरज आहे. भारतीयांमध्ये एकोपा निर्माण करु शकेल, असे नेतृत्व हवे आहे. जात, धर्म आणि प्रांताच्या नावावर भारतीयांमध्ये भेदाभेद करणारे आणि भारतीयांना भारतीयांविरुद्ध लढवणारे नेतृत्व नको. भविष्याचा वेध घेणारे नेतृत्व देशाला हवे. कायम भूतकाळात वावरणारे नेतृत्व नको. बुरसटलेली, कालबाह्य विचारधारा असलेले नेतृत्व नको, अशा शब्दांत अडवाणींचा नामोल्लेख टाळून डॉ. सिंग यांनी आपणच पंतप्रधानपदासाठी परफेक्ट उमेदवार असल्याचे संकेत दिले.
काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात भारताचा विकास दर ९ टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. भाजपप्रणित एनडीए सरकारच्या काळात तो जेमतेम ५.८ टक्क्यांच्या आसपास होता. काँग्रेसच्या सर्वांना सामावून घेण्याच्या धोरणामुळेच देशाची प्रगती होऊ शकली. याउलट भाजपच्या विभाजनवादी धोरणांमुळे विकासाचा वेग मंदावला, अशी तोफही पंतप्रधानांनी यावेळी डागली. आजमितीला आंतरराष्ट्रीय वर्तुळात भारताच्या शब्दाला मोठे महत्त्व आहे. महत्त्वाच्या मुद्यांवर भारताच्या भूमिकेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाते. भविष्यामध्ये एक ना एक दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला निश्चित स्थान मिळेल, असे भाकितही त्यांनी वर्तवले.
मुंबईमध्ये येताना आपल्या मनात संमिश्र भावना असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या दुःखात मी सहभागी आहे. मुंबईकरांनी मोठ्या धीराने या आपत्तीला तोंड दिले. मुंबई व महाराष्ट्राच्या या स्पिरीटला आपण सलाम करतो, असे सांगून दहशतवाद आणि अतिरेकीवाद हीच देशापुढील मुख्य आव्हाने आहेत. आपण सगळ्यांनी सामूहिक मुकाबला करुन दहशतवाद्यांचे फुटीर मनसुबे यशस्वी होऊ देता कामा नये. त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे आणि ती क्षमता केवळ काँग्रेसमध्ये आहे, असेही डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले.
मुंबई हे ख-या अर्थाने जागतिक शहर आहे. मुंबई म्हणजे आधुनिक, प्रगतीशील भारताचे प्रतिक आहे. आधुनिक भारत घडवण्याची संधी जनतेला आम्हाला पाच वर्षांपूर्वी दिली. ते स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही. राष्ट्र उभारणीचे अधुरे काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा काँग्रेसला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी यावेळी केले.

रविवार, १२ एप्रिल, २००९

शनिवार, ११ एप्रिल, २००९

आजची 'फेकाफेकी'

अपडेट 11 एप्रिल


गजानन किर्तीकर यांचा अर्ज अखेर वैध
गजानन किर्तीकर उत्तर-पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे उमेदवार
किर्तीकरांच्या उमेदवारीला काँग्रेसचा होता आक्षेप.

तिकीटासाठी माजी आमदार झाडावर
तिकीटासाठी माजी आमदार प्रेमपाल यांचं झाडावर चढून आंदोलन
काँग्रेस कार्यालयासमोरच्या झाडावर चढून प्रेमपाल यांनी तिकीटाची मागणी केली.

शुक्रवार, १० एप्रिल, २००९

आजची "फेकाफेकी"

अपडेट १० एप्रिल

शिवसेनेचा वचननामा जाहीर
* भूमीपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या देणार
* शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमुक्त करू (सातबारा कोरा करू)
* राज्य वीज भारनियमन मुक्त करू

तुकाराम रेंगे-पाटील काँग्रेसमध्ये
सोनियांच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश

नागपुरात दोन उमेदवारांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल
काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार आणि भाजपाच्या बनवारीलाल पुरोहीत यांच्यावर गुन्हा

बूटफेक्यांचा सुळसुळाट

राजकारण्यांवरचा राग काढण्याचं एकमेव साधन म्हणजे बूट, हे सिद्ध कऱणा-या एकापाठोपाठच्या घटना गेल्या काही दिवसांपासून घडतायेत. अशीच घटना आजही घडली. हरियाणाच्या कुरुक्षेत्रचे खासदार नवीन जिंदल यांच्यावरही आज बूट फेकून मारण्यात आला. जिंदल हे एका रॅलीमध्ये असताना एका निवृत्त शिक्षकाने त्यांच्यावर बूट फेकून मारला. राजपाल असं या शिक्षकांचं नाव असून ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.राजपाल यांनी दारूच्या नशेत असं वर्तन केलं आहे, असं विधान नवीन जिंदल यांनी केलंय.राजपाल यांची वैद्यकीय तपासणी कऱण्यात येणार आहे. तसेच सध्या त्यांची पोलीस चौकशी सुरू आहे.

गुरुवार, ९ एप्रिल, २००९

अपडेट 09 एप्रिल

उद्धव ठाकरे यांची प्रचारार्थ खामगावला (बुलढाणा) जाहीर सभा
* आधी आर.आर.पाटील सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलण्याची भाषा करायचे तेच आर.आर.पाटील आता सावकारांना कोपरापासून ते ढोपरापर्यंत चाटण्याची भाषा करतील -उद्धव ठाकरे
* शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून स्व:तच्या नावावर करायला....मी काही शरद पवारांच्या कुटूंबात जन्माला आलो नाही -उद्धव ठाकरे


राज ठाकरे यांची भांडुपला शिशिर शिंदेंच्या प्रचारार्थ जाहीर सभा

* शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी मराठी आठवते, मराठीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना लाठ्याकाठ्यांनी बदडतांना नाही आठवत - राज ठाकरे
* स्विस बँकेतले पैसे काढण्याची मागणी करतायत, सत्ता असताना का नाही काढले?
* भाजपवाले आता राममंदीर बांधायचं म्हणतायतं, साडेचार वर्षे काय केलं?राज ठाकरे

* टायटलर, सज्जनसिंग यांचे तिकीट कापले, दोघेही 84च्या शीख दंगलीतले आरोपी

बुधवार, ८ एप्रिल, २००९

एप्रिल 08 अपडेट

राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरे यांची टीका
*राजचा विरोध आधी बडव्यांवर होता, आता विठ्ठलावर आहे.
*राज स्व:तचा फोलपणा दाखवून देतोय - उद्धव ठाकरे



* सांगलीने भाजपला भाजपची लायकी दाखवली
* सांगलीत भाजपला साधा उमेदवारही मिळाला नाही - आर.आर.पाटील

कुडाळमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप
सिधुदुर्ग- कुडाळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी अर्ज दाखल
प्रिया दत्त यांची लढत भाजपच्या महेश जेठमलानी यांच्याशी


दक्षिण मध्य-मुंबईतून काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार लालकृष्ण अडवाणी यांचा गुजरातच्या गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल

शरद पवारांची आज ओरिसात भूवनेश्वरला सभा
* सिताराम येचुरीही राहणार सभेला उपस्थित
* ओरिसात राष्ट्रवादी-बीजू जनता दलाची युती

सांगलीत भाजपची नवी खेळी
* भाजपचे उमेदवार दीपक शिंदे यांचा उमेदवारी अर्ज मागे
* अपक्ष उमेदवार अजित घोरपडे यांना पाठिंबा, घोरपडे हे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार
* दीपक शिंदेंच्या नाराज कार्यकर्त्यांकडून मुंबई भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी


गोपीनाथ मुंडेंचा स्वतंत्र जाहीरनामा
* मुंडेंचा बीडमध्ये जाहीरनामा घोषित
* शेती पूरक उद्योगांना प्राधान्य
* बीडला विमानतळ उभारण्याचं आश्वासन

मंगळवार, ७ एप्रिल, २००९

अपडेट ०७ एप्रिल

चिदंबरम यांच्यावर भिरकावला बूट

* पी. चिदंबरम यांच्यावर दिल्लीत पत्रकार परिषदेत बूट भिरकावला.
* जगदीश टायटलर यांचे तिकीट कापले जाण्याची शक्य़ता
* बूट भिरकावल्यानंतर काँग्रेसची भूमिका

* टायटलर उत्तर-पूर्व दिल्लीतून काँग्रेसचे उमेदवार
* ८४च्या शीख दंगल प्रकरणात जगदीश टायटलर यांना क्लीनचीट
* क्लीनचीट दिल्यामुळे पत्रकारानं बूट भिरकावला
* बूट भिरकावणाऱ्या पत्रकाराचं नावं जर्नेल सिंग.
* अर्ध्यातासाच्या चौकशीनंतर जर्नैल सिंगची सुटका
* जर्नेल सिंग हा दैनिक ‘जागरण’चा पत्रकार
* जागरण जर्नेलवर कारवाई करणार
* जनैरलला अकाली दलाकडून दोन लाखांच बक्षिस

*****************************************************
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे समर्थन

* पत्रकार जर्नेल सिंगची भावना समजून घ्या – उद्धव ठाकरे
* राजची वक्तव्ये शिवसेनेसाठी अदखल पात्र – उद्धव ठाकरे
* लालू यादव यांना तरूंगात पाठवा – उद्धव ठाकरे


*****************************************************

* अरूण गवळी लोकसभा लढवणार नाहीत.
* अरूण गवळींची उमेदवारी मागे
* दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा
यांना गवळींचा पाठिंबा

*************************************************************

सोमवार, ६ एप्रिल, २००९

०६ एप्रिल, अपडेट

ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवारांचे मार्गदर्शन
*देशाला स्थिर सरकारची गरज, समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज
*एकाच पक्षाला बहुमत मिळण्याचे दिवस गेले

*शिव्या घालणे हाच मोदींचा एककलमी कार्यक्रम
*देशात विष कालवणाऱ्या शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज
*एक-एक जागा निवडून आणणे महत्वाचे
*सर्वच्या सर्व जागा जिंकून राज्यात चमत्कार करता आला तर पहा

*******************************************************************
धुळे मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार अमरिश पटेल यांचे नामांकन राखीव
दोन दिवसात म्हणणे सादर करण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आदेश
उमेदवारी अर्जासोबत खोटे प्रतिक्षापत्र, खोटी माहिती दिल्याचा अनिल गोटे यांचा आरोप

*******************************************************************
कर्जत- शरद पवारांची सभा
*सहा वर्षात मंदिर का बांधल नाही.
*मोदीच्या गुजरातचा अभिनान नाही तर गांधीजींच्या गुजरातचा अभिमान- शरद पवार

*******************************************************************
मनसे उमेदवाराचा अर्ज नाकारला
औरंगाबाद मतदार संघातील मनसेचे उमेदवार सुभाष पाटील यांच्या ए आणि बी फॉर्मवर वेगवेगळ्या सह्या
सुभाष पाटील हे मनसेचे उमेदवार असल्याचं मान्य करण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा नकार

*******************************************************************
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यात राज ठाकरे यांनी खालील मुद्दे मांडले.
* भाजपनं हिंदूत्वाचा आव आणू नये
* सत्तेसाठी शिवसेना – राष्ट्रवादीची छुपी युती
* बाळासाहेब मला नाही तर भाजपला विसरले
* देशात बोगस मतदारांचा सुळसुळाट
* सध्या मी खासदार निवडून आणण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे, ज्यांच्याकडे कमी खासदार आहेत त्यांनी ही पंतप्रधानपदावर लक्ष केंद्रीत केलं आहे, तर मी खासदार निवडून आणण्यावर लक्ष का देवू नये – राज ठाकरे
* मनसे १२ जागा लढणार असून राज ठाकरे २० दिवस दौरा करणार आहेत.
********************************************************************
निवडणूक आयोगाने राबडी देवींच्या भाषणाची सीडी मागवली
****************************************
शेखर सुमन यांना काँग्रेसचं पाटण्यातून तिकीट
शत्रुघ्न सिन्हांच्या विरोधात लढणार शेखर सुमन
****************************************
अबू आझमी उत्तर-पश्चिममधून सपाचे उमेदवार
अबू आझमी यांच्या रॅलीत कार्यकर्त्यांना वाटण्यात आले पैसे
****************************************
दक्षिण मुंबईतून फरहान आझमींना सपाचे तिकीट
फरहान आझमी अबू आझमींचा मुलगा
****************************************
सपाचे नेते अमरसिंग यांना छोटा राजनकडून धमकी
अबू आझमींपासून दूर राहण्याची राजनची धमकी

रविवार, ५ एप्रिल, २००९

अपडेट 05 एप्रिल

औरंगाबाद - स्वीत्झर्लंडला कॅबिनेट मंत्री काम नसताना गेले होते त्यांची चौकशी करा- लालकृष्ण आडवाणी यांची मागणी

पंतप्रधान होण हा शरद पवारांचा छुपा एजंडा – गोपीनाथ
मुंडे
नागपूर-भाजपवाल्यांनी घरं आणि घरवाल्यावाढवल्या – आर आर

पाटील
हिंगोली- दोन्ही काँग्रेसला छगन भुजबळांचा सल्ला- तिकीटासाठी भांडत राहिले तर आघाडीचा तोटा.


बीड- गडकरींना गाय आणि म्हैस हे तरी माहित आहे का? शेती म्हणजे काय हे पिशवीतलं दूध पिणाऱ्यांना काय कळणार? – अजित पवारांची नितीन गडकरी यांच्यावर टीका.

बीड- मुंडे हे पूनम महाजन यांना तिकीट देऊ शकले नाहीत ते कुठले राष्ट्रीय नेते त्यांना पक्षात किंमत नाही- अजित पवार यांची गोपीनाथ मुंडे यांच्यावरही टीका

बुधवार, १ एप्रिल, २००९

अपडेट 01 एप्रिल

तिसऱ्या आघाडीची भुवनेश्वरला सभा, सभेला शरद पवारही राहतील उपस्थित

काँग्रेसमध्ये पैसे देऊन तिकीट मिळतं- अभिनेत्री नगमाची काँग्रेसवर आगपाखड

‘उत्तर मुंबईतून मला निवडणूक लढवायची होती, ही निवडणूक जिंकणे माझ्यासाठी सोपं नाही’ ---- संजय निरूपम यांचे वक्तव्य

नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या मतदानाच्या वेळेत बदल
सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान
राज्यात गडचिरोली, भंडारा नक्षलग्रस्त जिल्हे

काँग्रेसचे दोन उमेदवार जाहीर
लातूरमधून जयवंत आवळे तर पालघरमधून दामू शिंगडा

रामटेक मतदार संघात मामा-भाची आमने सामने
सुलेखा कुंभारे यांच्या विरोधात जोगेंद्र कवाडे