रविवार, २४ मे, २००९
बुधवार, २० मे, २००९
रविवार, १७ मे, २००९
अपडेट 17 मे
- काँग्रेस कार्यसमितीची बैठक
- बैठकीला पंतप्रधान मनमोहन सिंग,सोनिया गांधी उपस्थित
- काँग्रेसला लालूप्रसाद यादवांची गरज नाही- बिहार काँग्रेस प्रभारी इकबाल सिंह यांचं वक्तव्य
- लालकृष्ण अडवाणींना भेटले संघाचे नेते
- उमा भारती अडवाणींना भेटल्या
- समाजवादी पार्टी काँग्रेसला पाठिंबा देणार - अमरसिंग
शनिवार, १६ मे, २००९
मनेका,चिदंबरम फेरमतमोजणीत विजयी
महाराष्ट्राचे 48 विजयी उमेदवार

केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील पराभूत

राष्ट्रवादीच्या तीन विद्यमान खासदारांना पराभव पत्कारावा लागला आहे. सूर्यकांता पाटील 1991 साली नांदेडमधून आणि 1998 साली हिंगोलीतून निवडून आल्या होत्या. एका निवडणुकीत विजय आणि त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव ही परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे हे विशेष.
भाजपाच्या किरीट सोमैय्यांचा धक्कादायक पराभव
राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात हादरा
राजकीय कारकिर्दीत कधीही मागे हटायचं नाही हे मंडलीकांचे स्वभाव वैशिष्ठ्ये त्याला अनुसरून मंडलीकांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं. मंडलिकांच्या झंझावाता समोर एक प्रकारे पवारांचाच पराभव झाला आहे.
हातकणंगलेतही निवेदिता माने पराभूत झाल्या आहेत. स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे हे निश्चित.
सुशीलकुमार शिंदे, प्रिया दत्त विजयी, राम नाईक पराभूत

पण शिंदे यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली आहे.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात प्रिया दत्त सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाचे महेश जेठमलानी यांचा पराभव केला आहे. बसपाच्या तिकिटावर लढतीत असलेले इब्राहीम भाईजान यांच्या झंझावती प्रचाराने मतविभागणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्याचा फटका प्रिया दत्त यांना बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण अखेरीस प्रिया दत्त विजयी झाल्या.

मुंबईतील दुसऱ्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. भाजपाचे दिग्गज उमेदवार राम नाईक यांना मुंबई उत्तर मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसचे संजय निरुपम यांनी नाईकांचा पराभव केला आहे. मनसेच्या शिरीष पारकर यांनी नाईकांच्या पराभवाला हातभार लावला.
दत्ता मेघे, प्रफुल पटेल विजयी तर अंतुले पराभूत

काँग्रेसने मानले आभार, भाजपला कौल मान्य
निलेश राणे विजयी

नारायण राणे यांच्या नात्यातील अंकुश राणे यांचे अपहरण आणि खुनामुळे या मतदारसंघातील वातावरण तणावपूर्ण झालं होत. नारायण राणे यांनी या संदर्भात सेनेच्या संजय राऊत आणि वैभव नाईक यांच्यावर आरोप केले होते.
राष्ट्रवादीचा निलेश राणे यांना विरोध होता पण नारायण राणेंनी यांनी आपलं सर्वस्व पणाला लावत आपले चिरंजीव निलेश राणे यांना निवडून आणलं आहे.
समीर भुजबळ अटीतटीच्या लढतीत विजयी
प्रचारादरम्यान छगन भुजबळ हळवे झाले होते त्यांनी मतदारांना समीर भुजबळ यांना निवडून देण्याकरता भावनिक आव्हान केलं होते.
शिवसेनेचे दत्ता गायकवाड, मनसेचे हेमंत गोडसे हे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे तर बसपाचे उमेदवार सुधारदास महंत हे ब्राह्मण समाजाचे उमेदवार रिंगणात असल्याने सर्वांचेच लक्ष नाशिकने वेधून घेतलं होतं.
मनसेच्या आंदोलनाला नाशिकमध्ये चांगला प्रतीसाद लाभला होता त्यामुळे या मतदारसंघात मनसेला विजयाच्या आशा होत्या. पण समीर भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या पदापर्णाच्या लढतीत विजय प्राप्त केला आहे.
महाराष्ट्रात भाजपाकडे दोन जागा

जालना लोकसभा मतदारसंघातुन रावसाहेब दानवे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे डॉ.कल्याण काळे यांचा पराभव केला आहे.
शिवसेनेने तीन जागा जिंकल्या

शिरुरमध्येही शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे यांचा पराभव केला आहे.
शिर्डीतही भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा पराभव केला आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातुन काँग्रेसचे सुरेश टावरे विजयी झाले आहेत. भिवंडीत पंचरंगी लढतीत भाजपाचे जगन्नाथ पाटील, मनसेचे डी.के.म्हात्रे, सपाचे आर.आर.पाटील, अपक्ष विश्वनाथ पाटील यांचा पराभव केला.
काँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा
काँग्रसने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा असं राष्ट्रवादी काँग्रेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. यूपीए 252 जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीए 158 जागांवर तसेच तिसऱी आघाडी 88 , चौथी 28 जागांवर आघाडीवर आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर छत्रपती उदयनराजे भोसले हे विजयी झाले आहेत. काँग्रेसची 14 जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेसचे माणिकराव गावित नंदूरबार मधून नवव्या वेळेस विजयी झाले आहेत.
माणिकराव गावितांचा अभूतपूर्व विक्रम
यावेळेस माणिकराव गावितांना बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांचे भाऊ शरद गावीत यांना समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे गावित आणि गावित यांच्या लढतीत मतविभागणीचा फायदा भाजपाच्या सुहास नटवदकरांना मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण हे सर्व आडाखे फोल ठरवत माणिकरावांनी विजयी परंपरा कायम राखली.
पालघरमधून बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव विजयी
त्या आधी महाराष्ट्रात पहिला निकाल सातारचा होता.. सातारा लोकसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती उदयनराजे भोसले विजयी झाले आहेत. उदयनराजे भोसले यांना 5,32,583 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी पुरुषोत्तम जाधव यांना 2,35,068 मतं मिळाली. जवळपास 85,000 मताधिक्क्याने ऊदयनराजे विजयी झाले आहेत
शुक्रवार, १५ मे, २००९
राहुल का जादू चल गया...

पहिल्या तीन तासांच्या मोजणीत काँग्रेस वीस मतदासंघात आघाडीवर आहे. गेल्या काही दशकातली ही काँग्रेसची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.
समाजवादी पक्षही २० ठिकाणी आघाडीवर आहे. बहुजन समाज पार्टीने ४० ते ५० जागा जिंकण्याचा दावा केला होता. बसपा २१ जागांवर आघाडीवर आहे. भाजपा फक्त १५ जागांवर आघाडीवर आहे. अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोक दल फक्त दोन जागा आघाडीवर आहे.
उत्तर प्रदेश मधील मतदार राष्ट्रीय पक्षांकडे झुकू लागल्याचं चित्र दिसत आहे. मागील निवडणुकीपेक्षा काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षांच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.
छ उदयनराजे भोसले विजयी
महाराष्ट्रातला पहिला निकाल जाहीर झाला असून सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती उदयनराजे विजयी झाले आहेत.
आघाडीवर असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे
ठाणे- संजीव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस
पालघर- बळीराम जाधव बहुजन विकास आघाडी
कल्याण- आनंद परांजपे शिवसेना
भिवंडी- सुरेश टावरे काँग्रेस
दक्षिण मुंबई- मिलिंद देवरा काँग्रेस
दक्षिण मध्य मुंबई- सुरेश गंभीर शिवसेना
मुंबई उत्तर पूर्व- प्रिया दत्त काँग्रेस
सांगली- प्रतीक पाटील काँग्रेस
जळगाव- ए.टी.पाटील
मुंबई उत्तर पश्चिम- गुरुदास कामत काँग्रेस
मुंबई उत्तर- संजय निरुपम काँग्रेस
मुंबई उत्तर पूर्व- संजय पाटील राष्ट्रवादी
औरंगाबाद- उत्तमसिंग पवार काँग्रेस
नंदुरबार- माणिकराव गावित काँग्रेस
लातूर- जयवंतराव आवळे काँग्रेस
नांदेड- भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेस
अकोला- संजय धोत्रे भाजपा
शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना
नागपूर- विलासराव मुत्तेमवार काँग्रेस
मावळ- गजानन बाबर शिवसेना
परभणी- गणेशराव दुधगावकर शिवसेना
चंद्रूपर- हंसराज अहिर भाजपा
बुलडाणा- डॉ. राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी
बारामती- सुप्रिया सुळे राष्ट्रवादी
हातकणंगले- राजू शेट्टी शेतकरी संघटना
धुळे- अमरिश पटेल काँग्रेस
कोल्हापूर- सदाशिवराव मंडलीक अपक्ष
उस्मानाबाद- पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी
दिंडोरी- हरिश्चंद्र चव्हाण भाजपा
बीड- गोपीनाथ मुंडे भाजपा
अमरावती- आनंदराव अडसूळ शिवसेना
गडचिरोली- अशोक नेते भाजपा
रामटेक- मुकुल वासनिक
निवडणुकीची इंटरेस्टिंग माहिती
दत्ता मेघेंची अनोखी हॅटट्रिक
१९९१ साली नागपूर, १९९६ रामटेक, १९९८ वर्धा
अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांत तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून विजय
२००४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकानंतर महाराष्ट्रात सहा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका
ठाणे, सांगली, जळगाव, एरंडोल, रामटेक, मुंबई उत्तर-मध्य
विलास मुत्तेमवार पहिल्यांदा १९८० साली लोकसभेवर निवडून गेले होते. आजवर एकदाच १९९६ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघात पराभूत झाले होते. आजपर्यंत सहा वेळा लोकसभेवर
दामू शिंगडा पहिल्यांदा १९८० साली लोकसभेवर निवडून गेले तेही पहिल्यांदा १९९६ साली पराभूत झाले होते. पाच वेळा लोकसभेवर
ए.आर.अंतुले लोकसभेच्या चार निवडणुका १९८९, १९९१ आणि १९९६ सलग तीन वेळा आणि २००४ साली विजयी.
तीन वेळा पराभूत १९८४, १९९८, १९९९ साली औरंगाबादमध्ये
सदाशिवराव मंडलिक १९९८, १९९९, २००४ तीन वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी
गुरुदास कामत १९८४, १९९१, १९९८ आणि २००४ चार वेळा विजयी
१९८९,१९९६ आणि १९९९ तीन वेळा पराभूत
सुरेश कलमाडी १९९६ आणि २००४ साली विजयी
प्रफुल्ल पटेल १९९१, १९९६ आणि १९९८ साली विजयी
१९९९ आणि २००४ साली पराभूत
अनंत गिते १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ साली सलग चार वेळा विजय
मोहन रावले १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ सलग पाचव्यांदा लोकसभेवर
शरद पवारांना पंतप्रधान बनवायचंय
गुरुवार, १४ मे, २००९
सोनिया गांधी शरद पवारांमध्ये चर्चा
त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काल रात्री सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीत सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतं.
सोनिया गांधींनी काल राष्ट्रीय जनता दलाचे लालु प्रसाद यादव आणि लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांच्याशी फोनवर चर्चा केली.
युपीए आणि एनडीए यांना जवळपास सारख्याच जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने बहुमताच्या दृष्टीने एक एक जागा महत्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही आघाड्यांनी राजकीय पक्षांना आपल्याकडे खेचण्याचे सर्व प्रयत्न सूरु केले आहेत.
काल रात्री मुकेश अंबानींनी प्रफुल पटेल यांच्या समवेत शरद पवार यांची भेट घेतल्याने राजधानीत तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.
वरुण गांधींवरचा रासुका हटवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

राज ठाकरे स्थानिक दहशतवादी - राम जेठमलानी

बुधवार, १३ मे, २००९
मंगळवार, १२ मे, २००९
शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज
शेवटच्या टप्प्यातलं मतदान सुरु झालंय आणि अॅक्टरपासून क्रिकेटरपर्यंत सर्वजण मतदानाला पोहोचताहेत. आज सकाळी माजी क्रिकेटर आणि अमृतसरमधले भाजपचे उमेदवार नवज्योतसिंह सिद्धू यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर आले फेमस साऊथ इंडियन स्टार कम पॉलिटिशियन रजनीकांत. त्यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अॅक्टर पाठोपाठ संगीतकार आणि ऑस्कर विनर ए आर रेहमान यांनी कुणाला जय हो म्हंटलं हे त्यांनाच माहित. पण आज चेन्नईत त्यांनीही मतदान केलं.
शिवाय या मतदानात पॉलिटीशियनही मागे नाहीत भाजपचे मुख्तार अब्बास नक्वी यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला.समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज रामपुरात आपल्या मतदानाचा ह्कक बजावला. जयाप्रदा समाजवादी पक्षाकडून रामपूर इथून निवडणूक रिंगणात आहेत.
तर दुसरीकडे तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एडीएमकेच्या नेत्या अम्मा जयललिता यांनीही आज चेन्नईत मतदान केलं.
देशात ७ राज्यात मतदान
बुधवार, ६ मे, २००९
गांधी घराण्याने बजावला मतदानाचा हक्क

मंगळवार, ५ मे, २००९
काँग्रेस डाव्यांना पाठिंबा देईल - राहुल गांधी
जर डाव्यांनी 180 ते 190 जागा मिळवल्या तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.जर असं झालं तर त्यांना पाठिंबा देणारा मी पहिला असेन,असं राहुल गांधी यांनी दिल्लीत अशोका हॉटेल येथील पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं.
काँग्रेस आणि डावे यांच्या तत्वप्रणालीत फरक आहे.पण तरिही काही गोष्टींमध्ये साम्य आहे,असंही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींनी असाही आत्मविश्वास व्यक्त केला की डावे मनमोहन सिंग यांना पंतप्रधान म्हणून मान्य करतील.मनमोहन सिंग हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत.मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत आणि मनमोहन सिंग यांच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे.
अडवाणी यांच्या स्विस बँकेवरील टिप्पणीबाबत राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं- मी अडवाणींच्या वक्तव्याबाबत पूर्णपणे सहमत आहे.स्विस बँकेत 60 वर्षांपासून भारताचे पैसे आहेत.आपण सर्वांनी मिळूनच ते पैसे सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.त्यासाठी एकत्र आले पाहिजे.ह्या प्रश्नाबाबत फक्त चर्चा करण्याऐवजी तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.