रविवार, २४ मे, २००९

बुधवार, २० मे, २००९

रविवार, १७ मे, २००९

अपडेट 17 मे

  • काँग्रेस कार्यसमितीची बैठक
  • बैठकीला पंतप्रधान मनमोहन सिंग,सोनिया गांधी उपस्थित
  • काँग्रेसला लालूप्रसाद यादवांची गरज नाही- बिहार काँग्रेस प्रभारी इकबाल सिंह यांचं वक्तव्य
  • लालकृष्ण अडवाणींना भेटले संघाचे नेते
  • उमा भारती अडवाणींना भेटल्या
  • समाजवादी पार्टी काँग्रेसला पाठिंबा देणार - अमरसिंग

स्वबळावर जिंकण्याची क्षमता काँग्रेसकडे - विलासराव देशमुख

राजधानीत काँग्रेसचा जल्लोष

दो मारा पर सॉलिड मारा - राज ठाकरे

शनिवार, १६ मे, २००९

राहुल की जय हो !

मनेका,चिदंबरम फेरमतमोजणीत विजयी

महाराष्ट्रात अनेक दिग्गजांना जनतेनं आसमान दाखवलं. यात केद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता पाटील, भाजपचे दिग्गज नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, सलग पाच वेळेस निवडून आलेले मोहन रावले, शिवसेनेचे चार वेळा आमदार राहिलेले आणि पहिल्यांदाच लोकसभा लढविणारे गजानन किर्तीकर, सलग तीन वेळा लोकसभेवर जाणारे रामदास आठवले, किरीट सोमय्या, प्रकाश आंबेडकर यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. भाजपच्या मनेका गांधी, केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम हे मात्र फेरमतमोजणीत विजयी ठरले.

महाराष्ट्राचे 48 विजयी उमेदवार

महाराष्ट्राचे 48 विजयी उमेदवार

1.नंदूरबार(एसटी)-उ.महाराष्ट्र-माणिकराव गावित (CONG)

2.धुळे-उ.महाराष्ट्र-प्रतापराव सोनावणे (BJP)

3.जळगाव-उ.महाराष्ट्र-ए. टी पाटील (BJP)

4.रावेर-उ.महाराष्ट्र-हरिभाऊ जावळे (BJP)

5.बुलडाणा-विदर्भ-प्रतापराव जाधव (SHS)

6.अकोला-विदर्भ-संजय धोत्रे (BJP)

7.अमरावती(एससी)-विदर्भ-आनंदराव आडसूळ (SHS)

8.वर्धा-विदर्भ-दत्ता मेघे (CONG)

9.रामटेक(एससी)-विदर्भ-मुकूल वासनिक (CONG)

10.नागपूर-विदर्भ-विलास मुत्तेमवार (CONG)

11.भंडारा-गोंदिया-विदर्भ-प्रफुल्ल पटेल (NCP)

12.गडचिरोली-चिमूर-विदर्भ-मारोतराव कोवासे (CONG)

13.चंद्रपूर-विदर्भ-हंसराज अहिर (BJP)

14.यवतमाळ-वाशिम-विदर्भ-भावना गवळी (SHS)

15.हिंगोली-मराठवाडा-सुभाष वानखेडे (SHS)

16.नांदेड-मराठवाडा-भास्करराव पाटील-खतगावकर(CONG)

17.परभणी-मराठवाडा-गणेश दूधगावकर (SHS)

18.जालना-मराठवाडा-रावसाहेब दानवे (BJP)

19.औरंगाबाद-मराठवाडा-चंद्रकांत खैरे (SHS)

20.दिंडोरी(एसटी)-उ.महाराष्ट्र-हरिश्चंद्र चव्हाण (BJP)

21.नाशिक-उ.महाराष्ट्र-समीर भुजबळ (NCP)

22.पालघर(एसटी)-कोकण-उ.महाराष्ट्र-बळीराम जाधव(बहुजन विकास)

23.भिवंडी-कोकण-सुरेश तावरे (CONG)

24.कल्याण-कोकण-आनंद परांजपे (SHS)

25.ठाणे-कोकण-संजीव नाईक (NCP)

26.मुंबई उत्तर-मुंबई-संजय निरूपम (CONG)

27.मुंबई वायव्य-मुंबई-गुरूदास कामत (CONG)

28.मुंबई ईशान्य-मुंबई-संजय दिना पाटील (NCP)

29.मुंबई-उत्तर-मध्य-मुंबई-प्रिया दत्त (CONG)

30.मुंबई-दक्षिण-मध्य-मुंबई-एकनाथ गायकवाड (CONG)

31.मुंबई दक्षिण-मुंबई-मिलिंद देवरा (CONG)

32.रायगड-कोकण-अनंत गिते (SHS)

33.मावळ-प.महाराष्ट्र-गजानन बाबर (SHS)

34.पुणे-प.महाराष्ट्र-सुरेश कलमाडी (CONG)

35.बारामती-प.महाराष्ट्र-सुप्रिया सुळे (NCP)

36.शिरूर-प.महाराष्ट्र-शिवाजीराव आढळराव (SHS)

37.अहमदनगर-प.महाराष्ट्र-दिलीप गांधी (BJP)

38.शिर्डी(एससी)-प.महाराष्ट्र-भाऊसाहेब वाकचौरे (SHS)

39.बीड-मराठवाडा-गोपीनाथ मुंडे (BJP)

40.उस्मानाबाद-प.महाराष्ट्र-मराठवाडा-पद्मसिंह पाटील (NCP)

41.लातूर(एससी)-मराठवाडा-जयवंतराव आवळे (CONG)

42.सोलापूर(एससी)-प.महाराष्ट्र-सुशीलकुमार शिंदे (CONG)

43.माढा-प.महाराष्ट्र-शरद पवार (NCP)

44.सांगली-प.महाराष्ट्र-प्रतिक पाटील (CONG)

45.सातारा-प.महाराष्ट्र-छ.उदयन राजे भोसले (NCP)

46.रत्नागिरी-सिंधुदुर्ग-कोकण-निलेश राणे (CONG)

47.कोल्हापूर-प.महाराष्ट्र-सदाशिवराव मंडलिक-स्वा.शे.सं

48.हातकणंगले-प.महाराष्ट्र-राजू शेट्टी - स्वा.शे.सं

केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील पराभूत


हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सुभाष वानखेडे विजयी झाले आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा धक्कादायक पराभव केला आहे.

राष्ट्रवादीच्या तीन विद्यमान खासदारांना पराभव पत्कारावा लागला आहे. सूर्यकांता पाटील 1991 साली नांदेडमधून आणि 1998 साली हिंगोलीतून निवडून आल्या होत्या. एका निवडणुकीत विजय आणि त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव ही परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे हे विशेष.

भाजपाच्या किरीट सोमैय्यांचा धक्कादायक पराभव

मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल लागला आहे. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातुन भाजपाच्या किरीट सोमैय्यांना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दीना पाटील यांनी त्यांचा पाच हजार मतांनी पराभव केला आहे. मुंबई उत्तर पूर्व मध्ये तिरंगी लढतीत संजय पाटील यांना 2,15,000, किरीट सौमैय्यांना 2,10,000 तर मनसेचे शिशिर शिंदे यांना 1,94,000 मतं मिळाली आहेत. शिंदे यांनी सौमैय्यांच्या पराभवाला हातभार लावल्याचं दिसून येतयं.

राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात हादरा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडलं आहे. कोल्हापूरमध्ये अपक्ष बंडखोर सदाशिवराव मंडलिक यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा धक्कादायक पराभव केला आहे. आजवर लोकसभेच्या निवडणुकीत कधीही पराभूत न होण्याची परंपरा मंडलिक यांनी राखली आहे.
राजकीय कारकिर्दीत कधीही मागे हटायचं नाही हे मंडलीकांचे स्वभाव वैशिष्ठ्ये त्याला अनुसरून मंडलीकांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं. मंडलिकांच्या झंझावाता समोर एक प्रकारे पवारांचाच पराभव झाला आहे.
हातकणंगलेतही निवेदिता माने पराभूत झाल्या आहेत. स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे हे निश्चित.

सुशीलकुमार शिंदे, प्रिया दत्त विजयी, राम नाईक पराभूत



सोलापूर राखीव मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे शरद बनसोडे यांचा पराभव केला आहे. माकपचे आमदार नरसय्या आडम यांनी बसपाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने शिंदे अ़डचणीत आले होते.

पण शिंदे यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली आहे.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात प्रिया दत्त सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाचे महेश जेठमलानी यांचा पराभव केला आहे. बसपाच्या तिकिटावर लढतीत असलेले इब्राहीम भाईजान यांच्या झंझावती प्रचाराने मतविभागणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्याचा फटका प्रिया दत्त यांना बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण अखेरीस प्रिया दत्त विजयी झाल्या.

मुंबईतील दुसऱ्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. भाजपाचे दिग्गज उमेदवार राम नाईक यांना मुंबई उत्तर मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसचे संजय निरुपम यांनी नाईकांचा पराभव केला आहे. मनसेच्या शिरीष पारकर यांनी नाईकांच्या पराभवाला हातभार लावला.

दत्ता मेघे, प्रफुल पटेल विजयी तर अंतुले पराभूत


वर्ध्यातून काँग्रेसचे दत्ता मेघे विजयी झाले आहेत त्यांनी भाजपाच्या सुरेश वाघमारे यांचा पराभव केला आहे. या आधी मेघे 1991 साली नागपूर, 1996 साली रामटेक आणि 1998 साली वर्ध्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. सलग तीन लोकसभा निवडणुका तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल विजयी झाले आहेत. पटेल यांना २००४ साली निसटत्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. भंडार-गोंदियात काँग्रेसचे आमदार नानाभाऊ पटोल यांनी बंडखोरी केल्याने प्रफुल पटेल यांना मतविभागणीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण पटेल यांनी तिरंगी लढतीत अखेर बाजी मारली. भाजपाचे विद्यमान खासदार शिशूपाल पटले यांना पराभव पत्करावा लागला आहे.रायगडमध्ये काँग्रेसचे विद्यमान खासदार ए.आर.अंतुले यांना शिवसेनेचे अनंत गीते यांच्या कडून पराभव पत्करावा लागला आहे. रायगडमध्ये अलिबागचे काँग्रेस आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव प्रवीण ठाकूर यांनी बंडखोरी केली होती. त्याचप्रमाणे अंतुलेंच्या कार्यपध्दतीबद्दल मतदारसंघात तीव्र नाराजीही होती.

काँग्रेसने मानले आभार, भाजपला कौल मान्य


पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशाच्या जनतेचे आभार मानले आहेत. तर भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याचही अरूण जेटली यांनी मान्य केलं आहे. देशाचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचं अरूण जेटली यांनी म्हटलं आहे.

निलेश राणे विजयी


रत्नागिरी-सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघातून डॉ.निलेश राणे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघातुन सुरेश प्रभू सलग चार वेळा निवडून आले होते. या मतदारसंघात बसपाचे जयेंद्र परुळेकर आणि काँग्रेस बंडखोर अकबर खलिफे हेही रिंगणात होते.

नारायण राणे यांच्या नात्यातील अंकुश राणे यांचे अपहरण आणि खुनामुळे या मतदारसंघातील वातावरण तणावपूर्ण झालं होत. नारायण राणे यांनी या संदर्भात सेनेच्या संजय राऊत आणि वैभव नाईक यांच्यावर आरोप केले होते.

राष्ट्रवादीचा निलेश राणे यांना विरोध होता पण नारायण राणेंनी यांनी आपलं सर्वस्व पणाला लावत आपले चिरंजीव निलेश राणे यांना निवडून आणलं आहे.

समीर भुजबळ अटीतटीच्या लढतीत विजयी

नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी अटीतटीच्या लढतीत विजयश्री खेचून आणली आहे. मनसेचे हेमंत गोडसे यांनी त्यांच्या समोर मोठं आव्हान उभं केलं होतं. जातीयवादी प्रचाराने नाशिक ढवळून निघालं होतं. मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करा असा उघड प्रचार झाल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जातीने लक्ष घातलं होतं.

प्रचारादरम्यान छगन भुजबळ हळवे झाले होते त्यांनी मतदारांना समीर भुजबळ यांना निवडून देण्याकरता भावनिक आव्हान केलं होते.

शिवसेनेचे दत्ता गायकवाड, मनसेचे हेमंत गोडसे हे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे तर बसपाचे उमेदवार सुधारदास महंत हे ब्राह्मण समाजाचे उमेदवार रिंगणात असल्याने सर्वांचेच लक्ष नाशिकने वेधून घेतलं होतं.

मनसेच्या आंदोलनाला नाशिकमध्ये चांगला प्रतीसाद लाभला होता त्यामुळे या मतदारसंघात मनसेला विजयाच्या आशा होत्या. पण समीर भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या पदापर्णाच्या लढतीत विजय प्राप्त केला आहे.

महाराष्ट्रात भाजपाकडे दोन जागा


जळगाव मधून भाजपाचे ए.टी.पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे वसंतराव मोरे यांचा पराभव केला आहे. जळगावातून राष्ट्रवादी संपवण्याची भाषा करणाऱ्या सुरेशदादा जैन यांनी मोरे यांच्या पराभवाला हातभार लावला आहे. राष्ट्रवादीचे मोरे लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाले होते.

जालना लोकसभा मतदारसंघातुन रावसाहेब दानवे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे डॉ.कल्याण काळे यांचा पराभव केला आहे.

शिवसेनेने तीन जागा जिंकल्या


महाराष्ट्रातील बहुतेक जागांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. त्यापैकी शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून आनंद परांजपे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे यांचा पराभव केला आहे. परांजपे यांचा सलग दुसरा विजय तर डावखरे यांचा सलग तिसरा पराभव.

शिरुरमध्येही शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे यांचा पराभव केला आहे.

शिर्डीतही भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा पराभव केला आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातुन काँग्रेसचे सुरेश टावरे विजयी झाले आहेत. भिवंडीत पंचरंगी लढतीत भाजपाचे जगन्नाथ पाटील, मनसेचे डी.के.म्हात्रे, सपाचे आर.आर.पाटील, अपक्ष विश्वनाथ पाटील यांचा पराभव केला.

काँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा

काँग्रसने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा असं राष्ट्रवादी काँग्रेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. यूपीए 252 जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीए 158 जागांवर तसेच तिसऱी आघाडी 88 , चौथी 28 जागांवर आघाडीवर आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर छत्रपती उदयनराजे भोसले हे विजयी झाले आहेत. काँग्रेसची 14 जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेसचे माणिकराव गावित नंदूरबार मधून नवव्या वेळेस विजयी झाले आहेत.

माणिकराव गावितांचा अभूतपूर्व विक्रम

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माणिकराव गावित यांनी सलग नव्यांदा विजय मिळवला आहे. गावित १९८१ साली पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर ते एकदाही पराभूत झाले नाहीत.

यावेळेस माणिकराव गावितांना बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांचे भाऊ शरद गावीत यांना समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे गावित आणि गावित यांच्या लढतीत मतविभागणीचा फायदा भाजपाच्या सुहास नटवदकरांना मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण हे सर्व आडाखे फोल ठरवत माणिकरावांनी विजयी परंपरा कायम राखली.

पालघरमधून बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव विजयी

महाराष्ट्रात दुसरा निकाल पालघर लोकसभा मतदारसंघाचा जाहीर झाला असून बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव विजयी झाले आहेत. या मतदारसंघात चौरंगी लढत होती. काँग्रेसचे दिग्गज उमेदवार दामु शिंगडा, भाजपाचे चिंतामण वणगा आणि माकपचे लहानु कोम यांना आस्मान दाखवत जाधवांनी विजय संपादन केला.

त्या आधी महाराष्ट्रात पहिला निकाल सातारचा होता.. सातारा लोकसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती उदयनराजे भोसले विजयी झाले आहेत. उदयनराजे भोसले यांना 5,32,583 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी पुरुषोत्तम जाधव यांना 2,35,068 मतं मिळाली. जवळपास 85,000 मताधिक्क्याने ऊदयनराजे विजयी झाले आहेत

शुक्रवार, १५ मे, २००९

राहुल का जादू चल गया...


राहुलबाबा का मॅजिक उत्तरप्रदेश में चल गया है. राहुल गांधींच्या झंझावती प्रचारामुळे उत्तरप्रदेशात काँग्रेसने धक्कादायक आघाडी घेतली आहे. आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसला कायम मार खावा लागत होता. पण राहुल गांधींच्या करिष्म्यामुळे काँग्रेस उत्तरप्रदेशात परत एकदा धावू लागला आहे.
पहिल्या तीन तासांच्या मोजणीत काँग्रेस वीस मतदासंघात आघाडीवर आहे. गेल्या काही दशकातली ही काँग्रेसची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.
समाजवादी पक्षही २० ठिकाणी आघाडीवर आहे. बहुजन समाज पार्टीने ४० ते ५० जागा जिंकण्याचा दावा केला होता. बसपा २१ जागांवर आघाडीवर आहे. भाजपा फक्त १५ जागांवर आघाडीवर आहे. अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोक दल फक्त दोन जागा आघाडीवर आहे.
उत्तर प्रदेश मधील मतदार राष्ट्रीय पक्षांकडे झुकू लागल्याचं चित्र दिसत आहे. मागील निवडणुकीपेक्षा काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षांच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.

छ उदयनराजे भोसले विजयी

साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले विजयी
महाराष्ट्रातला पहिला निकाल जाहीर झाला असून सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती उदयनराजे विजयी झाले आहेत.
आघाडीवर असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे
ठाणे- संजीव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस
पालघर- बळीराम जाधव बहुजन विकास आघाडी
कल्याण- आनंद परांजपे शिवसेना
भिवंडी- सुरेश टावरे काँग्रेस
दक्षिण मुंबई- मिलिंद देवरा काँग्रेस
दक्षिण मध्य मुंबई- सुरेश गंभीर शिवसेना
मुंबई उत्तर पूर्व- प्रिया दत्त काँग्रेस
सांगली- प्रतीक पाटील काँग्रेस
जळगाव- ए.टी.पाटील
मुंबई उत्तर पश्चिम- गुरुदास कामत काँग्रेस
मुंबई उत्तर- संजय निरुपम काँग्रेस
मुंबई उत्तर पूर्व- संजय पाटील राष्ट्रवादी
औरंगाबाद- उत्तमसिंग पवार काँग्रेस
नंदुरबार- माणिकराव गावित काँग्रेस
लातूर- जयवंतराव आवळे काँग्रेस
नांदेड- भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेस
अकोला- संजय धोत्रे भाजपा
शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना
नागपूर- विलासराव मुत्तेमवार काँग्रेस
मावळ- गजानन बाबर शिवसेना
परभणी- गणेशराव दुधगावकर शिवसेना
चंद्रूपर- हंसराज अहिर भाजपा
बुलडाणा- डॉ. राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी
बारामती- सुप्रिया सुळे राष्ट्रवादी
हातकणंगले- राजू शेट्टी शेतकरी संघटना
धुळे- अमरिश पटेल काँग्रेस
कोल्हापूर- सदाशिवराव मंडलीक अपक्ष
उस्मानाबाद- पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी
दिंडोरी- हरिश्चंद्र चव्हाण भाजपा
बीड- गोपीनाथ मुंडे भाजपा
अमरावती- आनंदराव अडसूळ शिवसेना
गडचिरोली- अशोक नेते भाजपा
रामटेक- मुकुल वासनिक

निवडणुकीची इंटरेस्टिंग माहिती

माणिकराव गावित लोकसभा निवडणुकीत सलग नवव्यांदा विजयी माणिकराव गावितांचा विक्रम

दत्ता मेघेंची अनोखी हॅटट्रिक
१९९१ साली नागपूर, १९९६ रामटेक, १९९८ वर्धा
अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांत तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून विजय

२००४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकानंतर महाराष्ट्रात सहा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका

ठाणे, सांगली, जळगाव, एरंडोल, रामटेक, मुंबई उत्तर-मध्य

विलास मुत्तेमवार पहिल्यांदा १९८० साली लोकसभेवर निवडून गेले होते. आजवर एकदाच १९९६ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघात पराभूत झाले होते. आजपर्यंत सहा वेळा लोकसभेवर

दामू शिंगडा पहिल्यांदा १९८० साली लोकसभेवर निवडून गेले तेही पहिल्यांदा १९९६ साली पराभूत झाले होते. पाच वेळा लोकसभेवर

ए.आर.अंतुले लोकसभेच्या चार निवडणुका १९८९, १९९१ आणि १९९६ सलग तीन वेळा आणि २००४ साली विजयी.
तीन वेळा पराभूत १९८४, १९९८, १९९९ साली औरंगाबादमध्ये

सदाशिवराव मंडलिक १९९८, १९९९, २००४ तीन वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी

गुरुदास कामत १९८४, १९९१, १९९८ आणि २००४ चार वेळा विजयी
१९८९,१९९६ आणि १९९९ तीन वेळा पराभूत

सुरेश कलमाडी १९९६ आणि २००४ साली विजयी

प्रफुल्ल पटेल १९९१, १९९६ आणि १९९८ साली विजयी
१९९९ आणि २००४ साली पराभूत

अनंत गिते १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ साली सलग चार वेळा विजय

मोहन रावले १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ सलग पाचव्यांदा लोकसभेवर

राज्यातील पक्षस्थिती- सकाळी ११







शरद पवारांना पंतप्रधान बनवायचंय

आम्हाला शरद पवारांना पंतप्रधान बनवायचंय, मात्र वास्तवाचही आम्हाला भान आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत सांगितलं.तसेच आम्ही सरकार बनवलं तर ते धर्मनिरपेक्ष सरकार बनवू असं पटेल यांनी म्हटलं आहे. तसेच आपण शिवसेनेच्या संपर्कात आहात का? असं विचारल्यावर त्यांनी आपण शिवसेनेच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत ही माहिती दिली.

गुरुवार, १४ मे, २००९

सोनिया गांधी शरद पवारांमध्ये चर्चा

निवडणुकांचे निकाल आता अवघ्या काही तासांनी लागणार आहेत. सरकार स्थापनेच्या दृष्टीने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काल रात्री सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीत सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतं.

सोनिया गांधींनी काल राष्ट्रीय जनता दलाचे लालु प्रसाद यादव आणि लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांच्याशी फोनवर चर्चा केली.

युपीए आणि एनडीए यांना जवळपास सारख्याच जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने बहुमताच्या दृष्टीने एक एक जागा महत्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही आघाड्यांनी राजकीय पक्षांना आपल्याकडे खेचण्याचे सर्व प्रयत्न सूरु केले आहेत.
काल रात्री मुकेश अंबानींनी प्रफुल पटेल यांच्या समवेत शरद पवार यांची भेट घेतल्याने राजधानीत तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.

वरुण गांधींवरचा रासुका हटवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश


वरूण गांधींवर उत्तर प्रदेश सरकारने लावलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा हटविण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. पिलीभीतमध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषण प्रकरणी मायावती सरकारने वरूण गांधीं यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई केली होती. त्याविरोधात वरूण गांधी यांनी सु्प्रीम कोर्टात धाव घेतली होती त्यावर निर्णय़ देताना आज सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला आहे. या निर्णयानंतर उत्तर प्रदेश सरकारने या आधी काढलेला वरूण गांधींविरूद्ध स्थानबद्ध करण्याचा आदेश मागे त्यांना घ्यावा लागणार आहे. वरूण गांधी हे उत्तर प्रदेशातल्या पिलीभीत मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.

राज ठाकरे स्थानिक दहशतवादी - राम जेठमलानी


देशाबाहेरच्या दहशतवाद्यांपेक्षा देशातल्या दहशतवाद्यांवर आधी कारवाई करा. राज ठाकरे हे देखील त्याच दहशतवाद्यांपैकी एक आहेत असं खळबळजनक वक्तव्य प्रख्यात कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी पुण्यात केलंय. स्टार माझा आणि पुणे पोलिसांच्या वतीनं आजोयित केलेल्या दहशतवाद आणि भारतासमोरील आव्हाने या परिसंवादात राम जेठमलानी बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बुधवार, १३ मे, २००९

मंगळवार, १२ मे, २००९

शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज


शेवटच्या टप्प्यातलं मतदान सुरु झालंय आणि अॅक्टरपासून क्रिकेटरपर्यंत सर्वजण मतदानाला पोहोचताहेत. आज सकाळी माजी क्रिकेटर आणि अमृतसरमधले भाजपचे उमेदवार नवज्योतसिंह सिद्धू यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर आले फेमस साऊथ इंडियन स्टार कम पॉलिटिशियन रजनीकांत. त्यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अॅक्टर पाठोपाठ संगीतकार आणि ऑस्कर विनर ए आर रेहमान यांनी कुणाला जय हो म्हंटलं हे त्यांनाच माहित. पण आज चेन्नईत त्यांनीही मतदान केलं.


शिवाय या मतदानात पॉलिटीशियनही मागे नाहीत भाजपचे मुख्तार अब्बास नक्वी यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला.समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज रामपुरात आपल्या मतदानाचा ह्कक बजावला. जयाप्रदा समाजवादी पक्षाकडून रामपूर इथून निवडणूक रिंगणात आहेत.
तर दुसरीकडे तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एडीएमकेच्या नेत्या अम्मा जयललिता यांनीही आज चेन्नईत मतदान केलं.

देशात ७ राज्यात मतदान

लोकसभेच्या शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यातलं मतदानाला सुरुवात झालीये. आजच्या टप्प्यात 7 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या 86 मतदारसंघात मतदानाला सुरुवात झालीये. जम्मूतल्या 2 आणि हिमाचल प्रदेशातल्या 4 जागांवर तर पंजाबमधल्या 9 आणी चंदिगडमधल्या एका जागेवर मतदानाला सुरुवात झालीये. तर उत्तर प्रदेशातल्या 14 जागांवर तसंच उत्तराखंडच्या 5 जागांवर मतदान होतंय. दक्षिणेकडे तामिळनाडूच्या 39 जागांवर तर पाँडेच्चरीच्या एका जागेवर मतदान होतंय. पूर्वेकडे बंगालमध्ये 11 जागांवर मतदार आपला हक्क बजावताहेत.

बुधवार, ६ मे, २००९

गांधी घराण्याने बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात गुरुवारी गांधी घराण्याचंही मतदान होतं. आधी प्रियंका गांधी यांनी पती रॉबर्ट वधेरासोबत दिल्लीत मतदान केलं. त्यानंतर काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्या सोबत दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित होत्या. आणि त्यानंतर पोहोचले गांधी घराण्याचे युवराज राहुल गांधी. त्यांच्या मतदानाला समर्थकांनी इतकी गर्दी केली होती की मतदान करताच त्यांना तिथून सुरक्षेच्या कारणास्तव काढता पाय घ्यावा लागला

मंगळवार, ५ मे, २००९

काँग्रेस डाव्यांना पाठिंबा देईल - राहुल गांधी

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ,"काँग्रेस डाव्यांना पाठिंबा देतील जर डावे 190 जागा मिळवण्यात यशस्वी झाले तर!" असे वक्तव्य केले.
जर डाव्यांनी 180 ते 190 जागा मिळवल्या तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.जर असं झालं तर त्यांना पाठिंबा देणारा मी पहिला असेन,असं राहुल गांधी यांनी दिल्लीत अशोका हॉटेल येथील पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं.
काँग्रेस आणि डावे यांच्या तत्वप्रणालीत फरक आहे.पण तरिही काही गोष्टींमध्ये साम्य आहे,असंही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींनी असाही आत्मविश्वास व्यक्त केला की डावे मनमोहन सिंग यांना पंतप्रधान म्हणून मान्य करतील.मनमोहन सिंग हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत.मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत आणि मनमोहन सिंग यांच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे.
अडवाणी यांच्या स्विस बँकेवरील टिप्पणीबाबत राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं- मी अडवाणींच्या वक्तव्याबाबत पूर्णपणे सहमत आहे.स्विस बँकेत 60 वर्षांपासून भारताचे पैसे आहेत.आपण सर्वांनी मिळूनच ते पैसे सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.त्यासाठी एकत्र आले पाहिजे.ह्या प्रश्नाबाबत फक्त चर्चा करण्याऐवजी तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

चौथ्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस

चौथ्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे उमेदवार आज पूर्ण ताकदीनं प्रचार करतील. देशभरात चौथ्या टप्प्यात 85 जागांसाठी, सात तारखेला मतदान होतंय. त्याचा प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता संपेल. जम्मू काश्मीर, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये सात तारखेला मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर, पंजाबमधल्या 4 जागांसाठी, हरियाणातल्या 10 जागांसाठी, राजस्थानातल्या 25 जागांसाठी, दिल्लीतल्या 7 जागांसाठी , उत्तर प्रदेशातल्या 18 जागांसाठी, बिहारमधल्या 3 आणि पश्चिम बंगालमधल्या 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

मुंबईत कलिना आणि कुर्ल्यात मतदान

मुंबईतल्या कलिना इथल्या 183, 185 आणि कुर्ल्यातल्या 229ए आणि 232 क्रमांकाच्या केंद्रावर आज फेरमतदान होतंय. या मतदानकेंद्रांवर 90 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्यामुळे याठिकाणी फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय. त्यानुसार आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. परंतु, मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसत नाही. तसंही, फेरमतदानाला फार प्रतिसाद मिळत नसल्याचाच पूर्वानुभव आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती आजही होणार असे दिसते. ऑफिसला सुटी नाही, मतदानाचं वातावरण नाही, कार्यकर्त्यांमध्येही फारसा उत्साह नाही आणि उमेदवारही कुठे दिसत नाहीत. त्यामुळे किती जण मतदानाला उतरतील, याबद्दल साशंकताच आहे. हे चित्र पाहता, मुंबईतल्या मतदानाची टक्केवारी आणखी किंचितशी घसरणार, असं दिसतंय.

शुक्रवार, १ मे, २००९

वरूण गांधींना दिलासा

भाजपा नेते वरूण गांधी यांना दिलासा मिळालाय. पॅरोलवर सुटलेल्या वरूण गांधी यांच्याविषयीची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयानं केली. वरूण गांधी हे १४ मे पर्यंत जेलबाहेर राहू शकतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयांनं दिलाय. पिलिभीत मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १३ मे ला मतदान होणार आहे. आणि न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार वरूण गांधी यांना १४ मेपर्यंत जेलच्या बाहेर राहण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं आज दिलेल्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पिलिभीतच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश सरकारनं त्यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावला होता. वरूण यांनी या प्रकारानंतर सरेंडरही केलं होतं, तसंच पुन्हा अशा प्रकारचं प्रक्षोभक भाषण करणार नाही असा, विश्वास दर्शवणारं पत्रही न्यायालयाला दिलं होतं.