शनिवार, १६ मे, २००९

मनेका,चिदंबरम फेरमतमोजणीत विजयी

महाराष्ट्रात अनेक दिग्गजांना जनतेनं आसमान दाखवलं. यात केद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता पाटील, भाजपचे दिग्गज नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, सलग पाच वेळेस निवडून आलेले मोहन रावले, शिवसेनेचे चार वेळा आमदार राहिलेले आणि पहिल्यांदाच लोकसभा लढविणारे गजानन किर्तीकर, सलग तीन वेळा लोकसभेवर जाणारे रामदास आठवले, किरीट सोमय्या, प्रकाश आंबेडकर यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. भाजपच्या मनेका गांधी, केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम हे मात्र फेरमतमोजणीत विजयी ठरले.