गुरुवार, १२ मार्च, २००९

...तर देशाच्या राजकारणात बदल होतील

पंतप्रधानपदाच्या शर्यती असलेल्या शरद पवारांनी आज नांदवडमध्ये सातारा जिल्ह्यानं राष्ट्रवादी पक्षाच्या मागे उभं राहण्याची गरज आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात काही बदल घडून येतील असं म्हटलं आहे. लोकसभा लढविण्य़ाची इच्छा नव्हती पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. लोकांच्या शुभेच्छा घेण्यासाठी आपण नांदवडमध्ये आलो आहोत तसेच समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. शरद पवारांनी आज त्यांच्या मूळगावी नांदवळमध्ये म्हातोबा मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. शरद पवारांनी आपल्या मुळगावी नांदवळमध्ये नारळ फोडून सुरूवात केली आहे. दरम्यान येत्य़ा चार दिवसांमध्ये शरद पवार 30 सभा घेणार आहेत. माढा लोकसभा मतदार संघातही शरद पवार सभा घेणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा