
मागील सोळा वर्ष शरद पवार यांच्याबरोबर असणा-या रामदास आठवलेंनी पवारांना रामराम ठोकून काँग्रेसच्या तंबूत प्रवेश केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आठवले काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणार असून त्यांच्या रिपाई पक्षाने पवारांशी असलेली युती तोडून काँग्रेसबरोबर समझोता केला आहे. पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्यानंतर आठवलेंना केंद्रात मंत्री करण्याचं आश्वासन शरद पवारांनी दिलं होतं. मात्र ते पूर्ण केलं नाही. शेवटी शिर्डी मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्याने तसंच पवारांकडूनही अपेक्षाभंग झाल्याने
आठवलेंनी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातच त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली.
आठवलेंनी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातच त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली.