''टू बी ऑर नॉट टू बी''अशा गर्तेत सापडलेली शिवसेना-भाजपाची युती अखेर होणारच अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यापासूनच शिवसेना-भाजपाच्या युतीवर अनिश्चिततेचे ढग दाटू लागले होते, पण जागावाटपावरून चालू झालेल्या''तुम्हाला-आम्हाला''नाट्यावर अखेर रात्री उशीरा पडदा पडला आणि 22-26 जागांच्या सेना-भाजपा युतीच्या पारंपरिक फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या काही दिवसात सेना भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका ,आव्हान-प्रतिआव्हानांची आतिषबाजी केल्यामुळे ''कमळाबाई''आणि''वाघोबा''यांच्यात काडीमोड होऊन संसार मोडतोय की काय अशा अटकळी राजकीय गोटात बांधल्या गेल्या होत्या पण त्या अटकळींना आता पूर्णविराम मिळालाय. त्यामुळं घड्याळबाईंना गॅलरीत डोळा मारण्याच्या आणि कमळाबाईंनी गुजरातच्या काकांचा सल्ला घेऊन पुढील वाटचाल स्वतंत्रपणे करण्याच्या ऊत आलेल्या चर्चांनाही आता पूर्णविराम मिळालाय. दरम्यान कळीचा मुद्दा ठरलेली कल्याणची जागा राखण्यात मात्र शिवसेनेला यश मिळाल्याची माहिती विशा्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा