सोमवार, ९ मार्च, २००९

सेना भाजपा दरम्यान जागा वाटपाचा तिढा कायम

शिवसेना भाजपामध्ये 22-26 असा फॉर्म्युला फायनल झाल्याचं सांगितलं जातय पण त्याची अधिकृत घोषणा मात्र अजुनही झालेली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार भिवंडी मतदारसंघावरून सेना भाजपात अजुनही वाद असल्याचं सांगितलं जातय. पण जो फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जातय त्यानुसार भाजपानं कल्याणचा आग्रह सोडलेला आहे त्यामुळे तिथं सेना उमेदवार लढेल तर दक्षिण मुंबई आणि जळगावच्या जागेवरचा हक्क सेनेनं सोडला असून तिथं भाजपाच निवडणूक लढवेल असं सांगितलं जातय. पण सध्या घोडं अडलय ते भिवंडीच्या जागेवरून. पण सेना भाजपातले सर्व वाद संपल्याचा दावा शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा