चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांनी जनमानसावर असलेल्या गारुडाचं वापर करत राजकारणात पहिल्यांदा प्रवेश केला तो दक्षिण भारतात. एम.जी.रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललितांनी लोकांच्या हृदयावर अधिराज्य तर गाजवलचं पण राजकारणात सत्तारुढ होत ते राज्यकर्तेही झाले. आता हे लोण फक्त दक्षिण भारतापूरतं मर्यादीत न राहता संपूर्ण देशभर पसरलं आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये राजकारणात सक्रिय असलेल्या फिल्मी तारा तारकांचा हा लेखाजोखा.
चिरंजीवी
आंध्र प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीत मेगा स्टार चिरंजीवी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. चिरंजीवीने प्रजा राज्यम पक्षाची स्थापना केलीय. मागील वर्षी त्याने तिरुपती येथे नव्या पक्षाची घोषणा केली होती तिथूनच तो निवडणूक लढवणार आहे. चिरंजीवीसोबतच त्याचा धाकटा भाऊ पवन कल्याण स्टार कॅम्पेनर असणार आहे. तर त्याचा दुसरा भाऊ नागेंद्र बाबू निवडून येण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघात रणनीती आखणार आहे. चिरंजीवी सध्या रोड शोज आणि जाहीर सभांमध्ये व्यस्त आहे.
तेलगु जनता ज्यांना दैवतासमान मानते त्या एन.टी.रामाराव यांचे चिरंजीव नंदमुरी बाळकृष्ण यांची लोकप्रियता चिरंजीवी एवढीच आहे. तेलगु देसमचे अध्यक्ष एन.चंद्रबाबू नायडू आणि एनटीआर घराण्याला जोडणारा दुवा म्हणजे नंदमुरी बाळकृष्ण. एनटी रामाराव यांच्या विरोधात नायडुंनी बंड केल्यानंतर बाळकृष्ण आणि त्यांच्यात वितुष्ट आलं. पण आता नायडुंनी परत एकदा बाळकष्ण यांच्या बरोबर जुळुन घेतलं आहे.
आता तेलगु देसमसाठी एनटीआर ज्युनिअर आणि तारका रत्न प्रचार करणार आहेत. नंदमुरी बाळकृष्ण आगामी लोकसभा लढवणार आहेत.
जयसुधा
सत्तर आणि ऐशींच्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या जयसुधाने गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जयसुधांमुळे काँग्रेसच्या प्रचाराला ग्लॅमरची झळाली लाभली. यावळेस त्यांना विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. जयसुधा राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांनी प्रजा राज्यमच्या पवन कल्याणला असंसदीय भाषा वापरल्याबद्दल धारेवर धरलं.
विजयाशांती
किरण बेदींच्या आयुष्यावर आधारीत सुपरहिट तेलगु सिनेमा कर्तव्यमची नायिका विजयशांतीने 1997 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. आता ती तेलंगणा राष्ट्र समिती पक्षात आहे. विजयशांतीनं आपला तल्ली तेलंगणा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीत विलीन केल्यानंतर, तिची महासचिव म्हणून नेमणूक करण्यात आलीय. लोकसभेसाठी विजयशांती रिंगणात असण्याची शक्यता आहे.
रोजा सेल्वामणी
तेलगु देसमच्या महिला आघाडीची प्रमुख असलेली सेल्वामणी हे एक वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे. नुकतीच तिने दुसऱ्या राजकीय पक्षात असलेल्या सिनेतारकांवर शेरेबाजी करुन वाद ओढवून घेतला होता.
तिने काँग्रेसतर्फे 2004 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती पण त्यात ती पराभूत झाली. आता ती परत एकदा नशीब आजमावणार आहे.
महाराष्ट्र
हेमामालिनी हिंदी चित्रपटसृष्टीतली सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री. सध्या भाजपतर्फे राज्यसभेवर आहे. हेमामालिनी प्रचारात आघाडीवर राहणार आहेत.
स्मृती इराणी
क्योंकि सांस भी कभी बहू थी मालिकेमुळे तुलसी साकारणारी स्मृती इराणी घराघरात पोहचली. सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढण्यासाठी त्यांचही नावं चर्चेत आहे. तसंच बडोद्यातूनही त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
गोविंदा
मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडून आलेला गोविंदा सर्वात निष्क्रीय खासदार म्हणून ओळखला जात असला तरी पुन्हा लढण्याची त्याची इच्छा आहे.
होळीच्या दिवशी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्याला नोटीस जारी केली आहे.
नग्मा
काँग्रेसकडून नग्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मुंबई किंवा उत्तर प्रदेशातनं ती निवडणुक लढवणार असल्याची चर्चा आहे.
पश्चिम बंगाल
ममता बॅनर्जीने मतदारांना आकृष्ट करण्यासाठी बंगालमधील सुपरस्टार माधवी मुखर्जी आणि नारायण दास यांचा उपयोग प्रचारात करु घेतला होता.
तपस पॉल
तपस पॉल गेली तीन दशकं बंगालमधील सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. कृष्णनगर मतदासंघांसाठी त्याच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. तपस पॉल कोलकत्त्यातल्या अलीपूर विधानसभा मतदारसंघातून लागोपाठ दोनदा निवडून आलाय. आता ते कृष्णनगर जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
शताब्दी रॉय
समीक्षकांनी गौरवलेली शताब्दी रॉय ही गुणी अभिनेत्री आता बिरभूम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पंचवीस वर्षाहून अधिक काळ टॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी शताब्दी ऱॉय राजकारणात यशस्वी होते का ते पाहायचं.
तमिळ फिल्म इंडस्ट्रीने तमिळ राजकारणावर अधिराज्य गाजवलं आहे. एमजी रामचंद्रन, जयललिता आणि करुणानिधींनी सिनेमा आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात असामान्य कामगिरी करुन दाखवली आहे.
शरतकुमार
शंभरहून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या शरतकुमारची राजकीय कारकिर्दीनेही नाट्यमय वळणं घेतली आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघम मध्ये त्यानं 1988 साली प्रवेश केला पण तो फार काळ या पक्षात राहू शकला नाही. शरतकुमार आणि त्याची पत्नी राधिका या दोघांनी 2006 साली DMKला सोडचिठ्ठी दिली आणि AIADMKमध्ये दाखल झाले. पण AIADMKला सत्ता काबीज करता आली नाही आणि त्यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यानंतर सत्ताधारी पक्षाशी संबंध ठेवल्याबद्दल राधिकाला AIADMKने बाहेरचा रस्ता दाखवला. शरत कुमारनेही लवकरच बाहेर पडत AISMK पक्षाची स्थापना केली आणि जानेवारी महिन्यात तिरुमंगलम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तो पराभूत झाला. आता तो किंवा त्याची पत्नी नाडर बहुल मतदारसंघातून परत एकदा नशीब आजमावणार असल्याची बातमी आहे.
नेपोलियन
नेपोलियनने देखील 100 हून अधिक चित्रपटात काम केलं आहे आणि तो एक प्रथितयश व्यवसायिक देखील आहे. त्यानं डीएमके तर्फे 2001 साली निवडणूक लढवली आणि जिंकला. पण त्याला 2006 सालच्या निवडणुकीत एस.व्ही.शेखर या चित्रपट आणि नाटक क्षेत्रातल्या दिग्गजाकडून पराभव पत्करावा लागला. सध्या राजकारणात नेपोलियन फारसा सक्रीय नाही पण तरीही संभाव्य उमेदवार म्हणून त्याच्या नावाची चर्चा आहे.
जे.के.रितेश
नवोदित रितेशच्या नावावर फक्त दोनच चित्रपट असले तरी त्याचे आजोबा सूबा तंगवेलन हे सध्याच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण मंत्री आहेत. तसंच करुणानिधींचे मोठे चिरंजीव एम.के. अळगिरी यांचा तो समर्थक आहे ही त्याची आणखी एक जमेची बाजू. मदूराईवर अळगिरीचं वर्चस्व आहे.
उत्तर भारतीय चित्रसृष्टी
मनोज तिवारी
एकेकाळी गावच्या रामलीलांमध्ये भूमिका करणारा मनोज तिवारी हा आजचा सर्वात मोठा भोजपुरी स्टार आहे. जौनपूरमधून सपाच्या तिकिटावर तो निवडणूक लढणार आहे. मनोज तिवारी हा चांगला गायक असून त्याच्या काही कॅसेट्सही बाजारात उपलब्ध आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाने मनोज तिवारीला तिकिट देऊ केलं होतं पण त्यानं ते नाकारलं. मनोज तिवारीला प्रचंड फॅन फोलोइंग आहे
रवीकिशन
हा आणखी एक भोजपुरी स्टार. त्याला काँग्रेसकडून तिकीटाची अपेक्षा आहे. एकेकाळी त्याचं नाव नग्मा सोबत जोडलं गेलं होतं. नग्माही काँग्रेसक़डून लढण्याची शक्यता आहे. मी यश आणि किर्ती संपादन केली आहे आता माझ्या लोकांसाठी मला काही तरी करायचं आहे असं रवीकिशन म्हणतो. या प्रतिक्रियेवरुन तो उत्तम राजकारणी होईल यात शंका नाही.
राज बब्बर
समाजवादी पक्षातर्फे आग्रा मतदारसंघातून लोकसभा गाठलेला राज बब्बर आता काँग्रेसच्या तंबूत दाखल झाला आहे. आगामी निवडणूक तो फतेहपूर सिक्रीतनं लढवणार आहे.

संजय दत्त
अनेकदा वादग्रस्त ठरुन टाडात जेलची हवा खाऊन तरीही आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेला संजय दत्त आता समाजवादी पक्षातर्फे लखनौतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
जयाप्रदा
जयाप्रदाने आठ भाषांमधल्या 300 चित्रपटात काम केलं आहे. तेलगु आणि हिंदी सुपरस्टार असलेल्या जयाप्रदाचं हिंदी यथातथा असताना ती चक्क उत्तरप्रदेशातनं निवडून आली. जयाप्रदा तेलगु देसमच्या माध्यमातून राजकारणात आली. पण एन टी रामाराव यांच्या विधवा पत्नी लक्ष्मी पार्वती यांच्या बरोबर झालेल्या वादामुळे तिने समाजवादी पक्षात प्रवेश केला.
उत्तरप्रदेशातल्या रामपूर मतदारसंघात रामपूर राजघराण्याच्या नूरबानो यांचा पराभव करत तिनं लोकसभा गाठली. आता ती परत एकदा तिथूनच नशीब आजमावणार आहे.
चिरंजीवी

तेलगु जनता ज्यांना दैवतासमान मानते त्या एन.टी.रामाराव यांचे चिरंजीव नंदमुरी बाळकृष्ण यांची लोकप्रियता चिरंजीवी एवढीच आहे. तेलगु देसमचे अध्यक्ष एन.चंद्रबाबू नायडू आणि एनटीआर घराण्याला जोडणारा दुवा म्हणजे नंदमुरी बाळकृष्ण. एनटी रामाराव यांच्या विरोधात नायडुंनी बंड केल्यानंतर बाळकृष्ण आणि त्यांच्यात वितुष्ट आलं. पण आता नायडुंनी परत एकदा बाळकष्ण यांच्या बरोबर जुळुन घेतलं आहे.
आता तेलगु देसमसाठी एनटीआर ज्युनिअर आणि तारका रत्न प्रचार करणार आहेत. नंदमुरी बाळकृष्ण आगामी लोकसभा लढवणार आहेत.
जयसुधा
सत्तर आणि ऐशींच्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या जयसुधाने गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जयसुधांमुळे काँग्रेसच्या प्रचाराला ग्लॅमरची झळाली लाभली. यावळेस त्यांना विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. जयसुधा राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांनी प्रजा राज्यमच्या पवन कल्याणला असंसदीय भाषा वापरल्याबद्दल धारेवर धरलं.
विजयाशांती
किरण बेदींच्या आयुष्यावर आधारीत सुपरहिट तेलगु सिनेमा कर्तव्यमची नायिका विजयशांतीने 1997 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. आता ती तेलंगणा राष्ट्र समिती पक्षात आहे. विजयशांतीनं आपला तल्ली तेलंगणा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीत विलीन केल्यानंतर, तिची महासचिव म्हणून नेमणूक करण्यात आलीय. लोकसभेसाठी विजयशांती रिंगणात असण्याची शक्यता आहे.
रोजा सेल्वामणी
तेलगु देसमच्या महिला आघाडीची प्रमुख असलेली सेल्वामणी हे एक वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे. नुकतीच तिने दुसऱ्या राजकीय पक्षात असलेल्या सिनेतारकांवर शेरेबाजी करुन वाद ओढवून घेतला होता.
तिने काँग्रेसतर्फे 2004 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती पण त्यात ती पराभूत झाली. आता ती परत एकदा नशीब आजमावणार आहे.
महाराष्ट्र
हेमामालिनी हिंदी चित्रपटसृष्टीतली सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री. सध्या भाजपतर्फे राज्यसभेवर आहे. हेमामालिनी प्रचारात आघाडीवर राहणार आहेत.
स्मृती इराणी
क्योंकि सांस भी कभी बहू थी मालिकेमुळे तुलसी साकारणारी स्मृती इराणी घराघरात पोहचली. सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढण्यासाठी त्यांचही नावं चर्चेत आहे. तसंच बडोद्यातूनही त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
गोविंदा
मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडून आलेला गोविंदा सर्वात निष्क्रीय खासदार म्हणून ओळखला जात असला तरी पुन्हा लढण्याची त्याची इच्छा आहे.
होळीच्या दिवशी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्याला नोटीस जारी केली आहे.
नग्मा

काँग्रेसकडून नग्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मुंबई किंवा उत्तर प्रदेशातनं ती निवडणुक लढवणार असल्याची चर्चा आहे.
पश्चिम बंगाल
ममता बॅनर्जीने मतदारांना आकृष्ट करण्यासाठी बंगालमधील सुपरस्टार माधवी मुखर्जी आणि नारायण दास यांचा उपयोग प्रचारात करु घेतला होता.
तपस पॉल
तपस पॉल गेली तीन दशकं बंगालमधील सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. कृष्णनगर मतदासंघांसाठी त्याच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. तपस पॉल कोलकत्त्यातल्या अलीपूर विधानसभा मतदारसंघातून लागोपाठ दोनदा निवडून आलाय. आता ते कृष्णनगर जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
शताब्दी रॉय
समीक्षकांनी गौरवलेली शताब्दी रॉय ही गुणी अभिनेत्री आता बिरभूम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पंचवीस वर्षाहून अधिक काळ टॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी शताब्दी ऱॉय राजकारणात यशस्वी होते का ते पाहायचं.
तमिळ फिल्म इंडस्ट्रीने तमिळ राजकारणावर अधिराज्य गाजवलं आहे. एमजी रामचंद्रन, जयललिता आणि करुणानिधींनी सिनेमा आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात असामान्य कामगिरी करुन दाखवली आहे.
शरतकुमार
शंभरहून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या शरतकुमारची राजकीय कारकिर्दीनेही नाट्यमय वळणं घेतली आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघम मध्ये त्यानं 1988 साली प्रवेश केला पण तो फार काळ या पक्षात राहू शकला नाही. शरतकुमार आणि त्याची पत्नी राधिका या दोघांनी 2006 साली DMKला सोडचिठ्ठी दिली आणि AIADMKमध्ये दाखल झाले. पण AIADMKला सत्ता काबीज करता आली नाही आणि त्यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यानंतर सत्ताधारी पक्षाशी संबंध ठेवल्याबद्दल राधिकाला AIADMKने बाहेरचा रस्ता दाखवला. शरत कुमारनेही लवकरच बाहेर पडत AISMK पक्षाची स्थापना केली आणि जानेवारी महिन्यात तिरुमंगलम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तो पराभूत झाला. आता तो किंवा त्याची पत्नी नाडर बहुल मतदारसंघातून परत एकदा नशीब आजमावणार असल्याची बातमी आहे.
नेपोलियन
नेपोलियनने देखील 100 हून अधिक चित्रपटात काम केलं आहे आणि तो एक प्रथितयश व्यवसायिक देखील आहे. त्यानं डीएमके तर्फे 2001 साली निवडणूक लढवली आणि जिंकला. पण त्याला 2006 सालच्या निवडणुकीत एस.व्ही.शेखर या चित्रपट आणि नाटक क्षेत्रातल्या दिग्गजाकडून पराभव पत्करावा लागला. सध्या राजकारणात नेपोलियन फारसा सक्रीय नाही पण तरीही संभाव्य उमेदवार म्हणून त्याच्या नावाची चर्चा आहे.
जे.के.रितेश
नवोदित रितेशच्या नावावर फक्त दोनच चित्रपट असले तरी त्याचे आजोबा सूबा तंगवेलन हे सध्याच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण मंत्री आहेत. तसंच करुणानिधींचे मोठे चिरंजीव एम.के. अळगिरी यांचा तो समर्थक आहे ही त्याची आणखी एक जमेची बाजू. मदूराईवर अळगिरीचं वर्चस्व आहे.
उत्तर भारतीय चित्रसृष्टी
मनोज तिवारी
एकेकाळी गावच्या रामलीलांमध्ये भूमिका करणारा मनोज तिवारी हा आजचा सर्वात मोठा भोजपुरी स्टार आहे. जौनपूरमधून सपाच्या तिकिटावर तो निवडणूक लढणार आहे. मनोज तिवारी हा चांगला गायक असून त्याच्या काही कॅसेट्सही बाजारात उपलब्ध आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाने मनोज तिवारीला तिकिट देऊ केलं होतं पण त्यानं ते नाकारलं. मनोज तिवारीला प्रचंड फॅन फोलोइंग आहे
रवीकिशन
हा आणखी एक भोजपुरी स्टार. त्याला काँग्रेसकडून तिकीटाची अपेक्षा आहे. एकेकाळी त्याचं नाव नग्मा सोबत जोडलं गेलं होतं. नग्माही काँग्रेसक़डून लढण्याची शक्यता आहे. मी यश आणि किर्ती संपादन केली आहे आता माझ्या लोकांसाठी मला काही तरी करायचं आहे असं रवीकिशन म्हणतो. या प्रतिक्रियेवरुन तो उत्तम राजकारणी होईल यात शंका नाही.
राज बब्बर
समाजवादी पक्षातर्फे आग्रा मतदारसंघातून लोकसभा गाठलेला राज बब्बर आता काँग्रेसच्या तंबूत दाखल झाला आहे. आगामी निवडणूक तो फतेहपूर सिक्रीतनं लढवणार आहे.

संजय दत्त
अनेकदा वादग्रस्त ठरुन टाडात जेलची हवा खाऊन तरीही आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेला संजय दत्त आता समाजवादी पक्षातर्फे लखनौतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
जयाप्रदा
जयाप्रदाने आठ भाषांमधल्या 300 चित्रपटात काम केलं आहे. तेलगु आणि हिंदी सुपरस्टार असलेल्या जयाप्रदाचं हिंदी यथातथा असताना ती चक्क उत्तरप्रदेशातनं निवडून आली. जयाप्रदा तेलगु देसमच्या माध्यमातून राजकारणात आली. पण एन टी रामाराव यांच्या विधवा पत्नी लक्ष्मी पार्वती यांच्या बरोबर झालेल्या वादामुळे तिने समाजवादी पक्षात प्रवेश केला.
उत्तरप्रदेशातल्या रामपूर मतदारसंघात रामपूर राजघराण्याच्या नूरबानो यांचा पराभव करत तिनं लोकसभा गाठली. आता ती परत एकदा तिथूनच नशीब आजमावणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा