गुरुवार, १२ मार्च, २००९

लोकसभा निवडणुकीनंतर तिसरी आघाडीत फूट- भाजप


लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्या आघाडीत फुट पडून तिसरी आघाडी संपुष्टात येईल असं भाजपनं म्हटलं आहे.तिसरी आघाडी फक्त पक्षाची शक्ती वाढवण्यास कामात येऊ शकते. स्वबळावर तिसरी आघाडी केंद्रात सरकार स्थापन करूच शकणार नसल्याचही भाजपचे राष्ट्रीय सचिव एस. तिरूनावुकरासर यांनी चेन्नईत म्हटलं आहे.काँग्रेस किंवा भाजपला केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी तिसरी आघाडी भूमिका बजाऊ शकते असंही भाजपचे राष्ट्रीय सचिव एस. तिरूनावुकरासर यांनी म्हटलं आहे. भाजपचं समविचारी पक्षांशी तामिळनाडूत युती करण्यासंबंधी चर्चा सुरू असल्याचही त्यांनी सांगितलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा