शनिवार, १४ मार्च, २००९

जनता दरबारी जाण्याआधी पुढारी साई दरबारात


निवडणुकीचं दिव्य पार करण्यासाठी जनता दरबारातून निवडून येणाऱ्या पुढाऱ्यांवी साई दरबारी गर्दी केली आहे. अनेक पुढाऱ्यांनी शिर्डीच्या साईबाबांना साकडं घालण्यास सुरूवात केली आहे. राजकीय़ नेते आणि उमेदवार साईबाबांच्या दरबारी गर्दी करू लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातीस साई भक्तांची संख्या वाढली आहे. राज्यातूनच नाही तर इतर राज्यातूनही साई भक्तांनी शिर्डीत गर्दी केली आहे.
प्रफुल्ल पटेल, पतंगराव कदम, जया प्रदा, स्मृति इराणी, लालूप्रसाद यादव, मुनिअप्पा, रामदास कदम, विजय वेडट्टीवार अशा अनेक पुढाऱ्यांचा समावेश आहे.
एवढच नाही तर काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधीही मागील वर्षी साई दरबारात येऊन नतमस्तक झाल्या होत्या. निवडणुकांचे दिव्य उभ राहिलं असताना पुढाऱ्यांना आता साईबाबांची आठवण होतं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा